शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

३० टक्क्यांनी शहरांचे प्रदूषण कमी करणार; एमपीसीबीच्या कार्यशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 2:23 AM

राज्यात २६ महापालिका असून, यामध्ये २३ हजार टन कचरा जमा होता. यात ९ हजार एमएलडी सांडपाणी निर्माण होेते.

औरंगाबाद : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासह पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच आॅनलाईन कार्यशाळा घेण्यात आली. यात २०२४ पर्यंत राज्यातील प्रमुख शहरांतील प्रदूषण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले.कार्यशाळेत १२ वेबिनार होणार असून, याची सुरुवात २० आगस्ट रोजी झाली. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ई. रवींद्रन, डॉ. व्ही. एम. मोटघरे, डॉ. दीपांकर सहा, दिल्ली आयआयटीचे अध्यक्ष रवींद्र कुमार, प्रो. प्रसाद मोडक, प्रकल्प समन्वयक डॉ. गीतांजली कौशिक यांच्यासह राज्यातील स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यालये, निरी, दिल्ली आयआयटीचे विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असे १५० जण सहभागी झाले होते.

ई. रवींद्रन म्हणाले की, राज्यात २६ महापालिका असून, यामध्ये २३ हजार टन कचरा जमा होता. यात ९ हजार एमएलडी सांडपाणी निर्माण होेते. या शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी दीर्घकालीन लढा उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. डॉ. गीतांजली कौशिक म्हणाल्या की, जून महिन्यात पुणे, नाशिक आणि ठाणे महापालिका प्रशासनाशी संवाद साधला. प्रकल्प समजावून घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज त्यांनी व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत डॉ. मोटघरे, तज्ज्ञ डॉ. दीपांकर सहा, प्रसाद मोडक यांनीही मार्गदर्शन केले.रवींद्र कुमार म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या आॅनलाईन कार्यशाळेत दिल्ली आयआयटी माजी विद्यार्थी संस्था प्रथमच सोबत काम करीत आहे. नॅशनल क्लीन एअर अभियानांर्तगत राज्यात मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालेले आहे. अनेक शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्यासह उपाययोजना आखल्या जात आहेत. मार्च २०२१ मध्ये प्रदूषण कमी करण्यासह जनजागृती करणाऱ्या राज्यातील सर्वोत्तम तीन शहरांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी जनजागृती करणाºया विद्यार्थ्यांना महायुवा पुरस्काराने सन्मानित केले जाईल.

टॅग्स :pollutionप्रदूषण