शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्षकथा

By वसंत भोसले | Updated: January 24, 2025 10:05 IST

Jaisingrao Pawar: ख्यातनाम इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने...

- वसंत भोसले
(संपादक, लोकमत कोल्हापूर)
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई आणि ज्यांनी मोगलशाही विरोधात एक हाती सात वर्षे संघर्ष केला, शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण केले, अशा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे पहिले समग्र चरित्र आज (शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी) प्रसिद्ध होत आहे.  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.  जयसिंगराव पवार यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध केलेला हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देऊन जातो. 

महाराणी ताराबाई म्हणजे करवीर संस्थानच्या संस्थापिका. त्यांनी केलेला संघर्ष, मोगलशाहीविरुद्ध दिलेली झुंज आणि छत्रपती घराण्यामध्ये दुही माजल्यानंतर त्यांनी दिलेला लढा  खूप महत्त्वाचा आहे. १६८० मध्ये महाराजांचे निधन झाल्यानंतर आणि औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर त्याच्या निधनापर्यंत सव्वीस वर्षे जो संघर्ष मराठ्यांनी केला, त्यातील तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समग्र इतिहास समोर यायला हवा होता. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षाचा इतिहास विविध अंगाने मांडण्यात आलेला आहे.  छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी कमी-अधिक प्रमाणात इतिहासाने नोंद घेतलेली आहे. या कालखंडात शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्यावर मात्र इतिहासकारांनी अन्याय केला. महाराणी ताराबाईंचा हा संघर्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात दोन खंडांमध्ये मांडला आहे. 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर १७०७ मध्ये औरंगजेबचे निधन होईपर्यंत मोगलांच्या विरोधात ताराराणी यांनी अविरत संघर्ष केला.  औरंगजेबाच्या  निधनानंतर मोगलांनी उत्तरेकडे परतण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे आणि येसूबाई यांची सुटका झाली आणि छत्रपती घराण्याच्या गादीच्या वारशावरून संघर्ष सुरू झाला. ताराराणी या (विधवा) स्त्रीने छत्रपती घराण्याचा वारसा पुरुष हक्काप्रमाणे शाहूराजे यांच्याकडे सोपवून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला हवे होते, असाच सूर अनेक इतिहासकारांनी आजवर लावला होता. महाराणी ताराबाई यांनी मराठेशाही टिकविण्यासाठी,  मोगलांचे अतिक्रमण परतवून लावण्यासाठी दिलेल्या संघर्षाकडे इतिहासाने तसे दुर्लक्षच केले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या पाच दशकांच्या इतिहास संशोधनाच्या कार्यकाळात सातत्याने महाराणी ताराबाई यांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा वेध घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजी किल्ल्यावर संरक्षणार्थ आश्रय घ्यावा लागला. त्या काळात हिंदवी स्वराज्य नेतृत्वहीन झाले होते, असा निष्कर्ष काढून इतिहासकारांनी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या लढ्याकडे साफ दुर्लक्ष केले. छत्रपतींच्या गादीवर शाहूराजे यांनी हक्क सांगितला तेव्हा शाहूराजे यांच्या विरोधात महाराणी ताराबाई यांनी दुसरा लढा केला. शाहूराजे यांना हाताशी धरून पेशवाई पुढे आली आणि सातारची राजधानी पुण्याला स्थलांतरित झाली. मराठ्यांचे स्वराज्याचे तात्त्विक अधिष्ठान जपले पाहिजे, यासाठी पेशव्यांच्या विरोधातदेखील संघर्ष करण्यासाठी महाराणी ताराबाई  प्रयत्नशील राहिल्या. असे संघर्षमय जीवन जगणारी ही लढवय्यी स्त्री इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षितच राहिली.  

डॉ. जयसिंगराव पवार यांनी या चरित्र ग्रंथाचे दोन खंडांमध्ये वर्गीकरण केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते औरंगजेबच्या विरोधात केलेल्या संघर्षापर्यंतचा पहिला खंड आहे. शाहू राजे यांची सुटका आणि महाराणी ताराबाई यांचा संघर्ष हे सारे दुसऱ्या  खंडात येते. ‘शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पुरस्कर्ते कोण?- महाराणी ताराबाई की शाहूराजे?’-  याचा शोध डॉ. पवार यांनी या चरित्रामध्ये घेतला आहे.  शिवछत्रपतींनी पाहिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेसाठी अखेरपर्यंत लढत राहिलेल्या एका रणरागिणीचा हा इतिहास नव्या स्वरूपात समोर येतो आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. 
    vasant.bhosale@lokmat.com

 

टॅग्स :marathaमराठाhistoryइतिहासMaharashtraमहाराष्ट्र