शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

"तुम्ही उधळे आहात की मूर्ख?; हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 6:35 AM

सतत नोकरी जायची भीती वाटते? हे अनेकांचं होतं. बॉस त्यांना शिव्या घालतो, अपमान करतो किंवा मग नवीन काही बदल होतात.

पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागार

हा लेख वाचून तुम्हाला कदाचित माझा राग येण्याची शक्यता आहे. विशेषत: तरुण मुलांना.  आपण अंथरुणाच्या बाहेर पाय पसरतो आहे, आणि अंथरूणच फाटतं आहे हेही अनेकांना कळत नाही. हातात असलेल्या पैशाचा काही विचारच नाही आणि चांगले पैसे कमावूनही अनेकजण कायम आर्थिक तंगीत असतात. आणि जरा आर्थिक संकट आलं की अगदी मोडून पडतात. हे असं का होतं?

१) चेक बाऊन्स होतात? काहीजण म्हणतात क्वचित होतात, म्हणजे पैसे नाहीत म्हणून नाही तर कधी ईएमआय जातो त्या खात्यात पैसे टाकायला विसरलो म्हणून, कधी वेगळाच चेक लागला म्हणून... पण म्हणजे तुमचे १२ पैकी ४ चेक जर बाऊन्स होत असतील तर काय पत राहिली तुमची? 

२) काहीच शिल्लक नाही? ५-८-१०-२० वर्षे नोकरी केली; पण आज परिस्थिती अशी की सहा महिने हातात नोकरी नसेल, महिन्याचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर  फे फे उडते..  कुठे गेला पगार? मिळकत बरी असूनही, काहीच आर्थिक जबाबदारी अंगावर नसताना अनेकांचे पासबुक रिकामेच.. कुठे जातो तुमचा पैसा

३) सतत नोकरी जायची भीती वाटते? हे अनेकांचं होतं. बॉस त्यांना शिव्या घालतो, अपमान करतो किंवा मग नवीन काही बदल होतात. संस्थेत तर यांना लगेच आपली नोकरी जायची भीती वाटते. बचत नसते, हाताशी काही साधनं जमवलेली नसतात, नोकरी गेलीच तर जरा शांतपणे आयुष्याचा विचार करण्याची  हिंमत नसते, कारण आर्थिक आत्मविश्वास शून्य! आपण सहा महिने तरून जाऊ इतपतही पैसा नसतो उरलेला हाताशी. म्हणून मग मन मारत काम करत राहावं लागतं.

४)  क्रेडिट कार्ड/ईएमआय? घर, गाडी, फर्निचर, टीव्ही, मोबाईल घेताना या साऱ्याचा ईएमआय आपल्यावर किती ओझं टाकेल याचा विचारच अनेकजण करत नाहीत. भरपूर पगार आहे, फेडू हप्ते, क्रेडिट कार्डवर घेऊ, एखादा महिना नाही त्याचा हप्ता गेला तरी चालतं असं म्हणत घोळ घालायचे. पण पगार कमी झाला, नोकरी गेली तर काय, याचा विचारही अनेकांच्या मनात येत नाही.

५) लाइफस्टाइल कर्ज - आपल्या डोक्यावर लाइफस्टाइलमुळे कर्ज झालं आहे, हेच मान्य करत नाहीत. आणि मग अजून आर्थिक घसरगुंडी सुरू होते, सुरूच राहते... तेव्हा, जरा सावध!

टॅग्स :MONEYपैसा