उमरगा नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न तेरणा धरणातील पाईपलाईन सतत फुटते. दिवसेंदिवस पाणी गळतीचे प्रमाण वाढले आहे. याच्या मदतीला विजेचा लपंडावही येताे. हे थाेडके म्हणून की काय, पाणी वितरण व्यवस्थेतील नियाेजनाचा अभाव त्यात आणखी भर टाकताे. त्यामुळे उमरगेकरांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागत आहे. हा प्रश्न गांभीर्याने घेऊन पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करावा, त्रिकोळी रोडलगत असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दरवाजे दुरूस्त करावेत, आदी मागण्यांसाठी शुक्रवारी शहरातील महिलांनी नगरपरिषदेसमाेर ठिय्या आंदाेलन केले. यावेळी रंगमा बडे, सलमा शेख, उषा कांबळे, हनुमंत पालमपल्ले आदींची उपस्थिती होती. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर विराेधी बाकावरील शिवसेनेचे नगरसेवक पंढरीनाथ कोने व भाजपचे कार्यकर्ते अमर वरवंटे यांनी घटनास्थळी धाव घेत महिलांशी चर्चा केली.
आंदोलन तीव्र करणार...
पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ही परिस्थिती असेल तर हद्दवाढ भागातील पाणीपुरवठ्याचा विचार न केलेलाच बरा. उपराेक्त प्रश्न लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीने उपाययाेजना करणे गरजेचे आहे. अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदाेलन करू, असा इशारा दिला आहे.