शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वीज कडाडताच करा मोबाईल बंद; झाडांपासून राहा दूर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : पावसाळा म्हटला की वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा भाग असतोच. वीज चमकताना मोबाईल बंद करणे ...

उस्मानाबाद : पावसाळा म्हटला की वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट हा भाग असतोच. वीज चमकताना मोबाईल बंद करणे आवश्यक असून झाडाखाली थांबणेही धोक्याचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आकाशातील वीज पडून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

विशेष करून गुरांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. पाऊस आला की रानातील गुरे ही पावसापासून बचावासाठी झाडाखाली थांबतात आणि नेमकी तेथेच वीज पडते. त्यामुळे गुरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अनेक ठिकाणी गुरांचे गोठे वृक्षाची सावली पाहून तयार केले जात असतात. पावसात वृक्षावरच वीज कोसळत असल्याने गोठ्यातील जनावरे तसेच नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. मागील साडेतीन वर्षात ११ जणांचा मृत्यू झाला. १७४ जनावरे दगावली आहेत.

वीज पडल्याने झालेले मृत्यू

वर्ष मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू

२०१८ ३ ३७

२०१९ ३ ६५

२०२० ५ ६२

२०२१ १५ जुलैपर्यंत ५ १०

कोणाला किती मिळते नुकसान भरपाई

वीज पडून मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास ४ लाखांची नुकसान भरपाई दिली जाते. एक आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असेल. तर १२ हजार ७०० रुपये मदत करण्यात आली. आठवड्यापेक्षा कमी कालावधीत उपचार घ्यावे लागले तर ४ हजार ३०० रुपये मदत दिली जाते.

शेळी, मेंढी दगावल्यास ३ हजार रुपये, वासरू दगावल्यास १६ हजार रुपये गाय, म्हैस ठार झाल्यास ३० हजार रुपये मदत दिली जाते.

वीज कडाडत असताना ही घ्या काळजी...

शेतात असाल तर शेताजवळील घराचा त्वरित आसरा घ्या,

पाण्यात असाल तर तत्काळ बाहरे या, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.

उंच जागेवर, झाडावर चढू नका, विद्युत उपकरणे बंद ठेवा,

मोबाईल, विजेवर चालणाऱ्या यंत्रापासून दूर राहा.

कोट...

पावसाळ्याच्या दिवसात वीज पडून मृत्यू मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी वादळवारा व विजांचा कडकडाट सुरू होताच. सुरक्षित जागी थांबणे, इलेक्ट्रिक उपकरणे, मोबाईल बंद ठेवावा.

वृषाली तेलोरे,

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

जिल्ह्यात वीज अटकाव यंत्रणा

किती

वीज पडून जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता प्रशासनाकडून जिल्ह्यात चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर वीज अटकाव मनोरे बसविण्यात आले आहेत.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द, उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा, उमरगा तालुक्यातील माडज, कळंब तालुक्यातील मोहा या ठिकाणी वीज अटकाव मनोरे उभे आहेत.

जिल्ह्यात आठ तालुके असताना केवळ चार तालुक्यातच वीज अटकाव मनोरे असल्याने अन्य तालुक्यातही वीज अटकाव मनोरे उभा करावेत, अशी मागणी नगारिकांतून होत आहे.