शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याची व्याप्ती वाढत असल्याने सुधारित सर्वेक्षण व अन्वेषण यास हिरवा कंदील ...

कळंब : लासरा बॅरेज ते रायगव्हाण प्रकल्प या जोडकालव्याची व्याप्ती वाढत असल्याने सुधारित सर्वेक्षण व अन्वेषण यास हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी निविदा प्रक्रिया होऊन गुंडाळला गेलेला हा प्रकल्प पुन्हा रुळावर येत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी एक्सेस होत असल्याने पुढे नदीवर १५ उच्च पातळी बंधारे (बॅरेज) बांधण्यात आले आहेत. यातील पहिला बॅरेज हा कळंब तालुक्यातील लासरा शिवारात आहे. एकूण तीन दलघमी साठवण क्षमता असलेला हा उच्च पातळी बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्यामधून ११.५३ दलघमी पाणी एक्सेस होते. असे असताना १० किमी अंतरावरील १२.७०१ दलघमी क्षमतेचा रायगव्हाण प्रकल्प मात्र सातत्याने तहानलेला असतो. यामुळेच मांजरा ओव्हरफ्लो झाल्यानंतर एक्सेस होणारे पाणी जोडकालव्याच्या माध्यमातून रायगव्हाणमध्ये टाकणाऱ्या योजनेस मंजुरी मिळाली होती. मात्र, याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पच गुंडाळण्यात आला होता. तद्नंतर मागच्या वर्षभरापासून हा विषय पुन्हा नव्याने अजेंड्यावर आला होता. यासाठी बंद पाईपलाईनचा पर्याय समोर ठेवत सर्वेक्षणाचा विचार समोर आला होता. दरम्यान, या दोन्ही प्रकल्पाच्या अधेमधे येणाऱ्या गावातील व लगतच्या शिवारातील अस्तित्वातील स्थापित साठवण क्षेत्रात पाणी वळते करावे, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी केली होती. यानंतर वाढणारी व्याप्ती व सर्व्हेसाठी तुटपुंजी तरतूद असा विषय समोर आला होता.

दरम्यान, गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना जलसंपदा विभागाच्या अवर सचिवांनी नुकतेच एक पत्र दिले असून, यात लासरा ते रायगव्हाण प्रकल्पात पाणी टाकण्याच्या योजनेची व्याप्ती वाढल्याने पूर्वीच्या उर्वरित रक्कमेतून सर्वेक्षण करणे उचित होणार नाही. यामुळे महामंडळाकडील सर्वेक्षण कामाकरिता उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून लासरा ते रायगव्हाण जोडकालव्याचे सर्वेक्षण व अन्वेषण करावे, असे सूचित केले आहे. यामुळे याचे विस्तृत सर्वेक्षण मार्गी लागणार आहे.

चौकट...........

कसे आहे स्वरूप, काय आहे मागणी?

दहा किमी अंतराच्या प्रस्तावित कालव्यासाठी सर्वेक्षण होणार आहे. यात एक्सेस ११.५३ दलघमी पाण्यापैकी ७ दलघमी पाणी रायगव्हाणमध्ये तर ४.५३ दलघमी पाणी रायगव्हाण, ताडगाव, घारगाव, जायफळ, लासरा, रांजणी येथील पाझर तलाव, लघू तलाव, बंधारे यात वळते करण्याचा अंतर्भाव करावा, अशी मागणी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी जूनमध्ये राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली होती. याशिवाय कार्यकारी अभियंता इलियास चिश्ती यांच्यासमवेत उस्मानाबाद येथे बैठक घेतली होती.