शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, कुटुंबाची जबाबदारी असल्याने आत्महत्या करणार नाही, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:35 IST

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची ...

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथून वाहणाऱ्या मांजरा नदीला पूर आल्यामुळे नगदीकाठच्या शेतातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या पिकांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पालकमंत्री थेट बांधावर दाखल झाले. यावेळी सुशिक्षित बेराेजगार शेतकरी विनायक आखाडे यांनी ‘‘साहेब, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मी संकटापुढे गुढगे टेकवून आत्महत्या करणार्यातील नाही. मात्र, शासनानेही काेल्हापूरच्या धर्तीवर भरीव मदत द्यावी’, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने केली.

उस्मानाबाद जिल्ह्याचे शेवटचे गाव असणारे पारगाव या,ठिकाणी गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. त्याच बरोबर या ठिकाणाहून वाहणारी मांजरा नदीच्या उगमपट्ट्यातही मोठा पाऊस झाल्याने नदीला महापूर आलेला होता. त्यामुळे मांजरा नदिलगत असलेल्या शेतीतील पिकांचे अताेनात नुकसान झाले. दरम्यान, ही नुकसान पाहण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख शुक्रवारी दुपारी १२ वाजता थेट शेतात दाखल झाले. यावेळी उपस्थित शेतकरी विनायक कल्याण आखाडे यांनी आपली कैफियत मांडली. २०१६ मध्येही अशीच महापुराची परस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही नदीलगत असलेली पिके पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली होती. तत्कालीन सरकारने मदतीचे आश्वासन देत तोंडाला पाने पुसून फक्त एकरी ८०० रुपये दिले होते. यावेळीही भयानक परस्थिती आहे. मी स्वतः एम. ए. बीएड सेट उत्तीर्ण आहे. बेरोजगारीमुळे शेती करत आहे. मात्र निसर्ग साथ देत नाही आणि सरकार तोंडाला पाने पुसत आहे. यावेळी तरी कोल्हापूरच्या धर्तीवर हेकटरी २० हजार रुपये मदत द्यावी. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने मी आत्महत्या तर करू शकत नाही. मात्र सरकारने भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीने त्यांनी केली. दरम्यान, पालकमंत्री गडाख म्हणाले, शासनाकडून अधिकाधिक मदत मिळावी, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. साेबतच नदी पात्राच्या खाेलीकरणाचे कामही हाती घेतले जाईल. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानी १०० रूपयांच्या बाॅण्डवर लिहून द्यावे. यानंतर लागलीच काम सुरू केले जाईल. शिवाय काेल्हापुरी बंधाराही दुरूस्त करू, अशी ग्वाही दिली. कळंब उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, गटविकास अधिकारी राजगुरू, जि. प.चे पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे, सरपंच महेश कोळी, उपसरपंच कॉ.पंकज चव्हाण, बाबा घोलप, विकास तळेकर, तात्यासाहेब बहिर, महेश आखाडे, श्रीनिवास उंदरे, बाबा हारे, तानाजी कोकाटे, बंडू मुळे, राष्ट्रवादीचे प्रकाश मोटे, समाधान मोटे, धनंजय मोटे, प्रकाश आखाडे आदींची उपस्थिती हाेती.

यांनी दिले निवेदन...

पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने रखडलेल्या कामांचे निवेदन उपसरपंच काॅ. पंकज चव्हाण यांनी दिले. तर मराठा महासंघाचे अध्यक्ष मुजमिल पठाण यांनीही निवेदन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांनी काळजी करू नये...

राज्य सरकारच्या भवितव्याच्या अनुषंगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच एक वक्तव्य केले हाेते. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता, त्यांनी सरकारच्या स्थिरतेबाबत काळजी करू नये. त्यांनी कितीही स्वप्न पाहिले तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात हे सरकार एकदिलाने काम करीत आहे.