शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य बाजारपेठ, ठाकरे चौकात कोंडी, वाहनांच्या गर्दीतून चालावे तरी कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

समीर सुतके उमरगा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. शहरातून जाणारा महामार्ग असो वा शहरातील ...

समीर सुतके

उमरगा : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी समस्या कायम आहे. शहरातून जाणारा महामार्ग असो वा शहरातील मुख्य बाजारपेठ असो, येथे कायम वाहनांची गर्दीमुळे असते. यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पादचाऱ्यांनादेखील मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे.

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट बनत आहे. विशेषत: बाळासाहेब ठाकरे चौक, इंदिरा चौक, आरोग्य नगरी कॉर्नर, पतंगे रोड, शिवपुरी कॉर्नर व मुख्य बाजारपेठ येथे वाहनांच्या गर्दीने कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होते. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये रस्ता खूपच अरुंद असल्याने पायी चालणे अवघड असताना येथे दुचाकी, रिक्षा यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे सर्वात जास्त कोंडी होताना दिसते. इंदिरा चौकातून महादेव मंदिराला जाणारा रस्ता मुळातच अरुंद. त्यातच रस्त्यावर दुभाजक केल्याने वाहनांच्या गर्दीतून पायी जाणे शक्य होत नाही. पतंगे रोडवर तर बेशिस्त वाहन पार्किंगसह भरधाव वाहने चालविली जात असल्याने येथे नेहमीच छोटे-मोठे अपघात होतात.

चौकट.....

महामार्गावर गर्दी

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कायम वाहनांची गर्दी असते. त्यात दोन्ही बाजूंनी फळविक्रेते, भाजी विक्रेते, लहानसहान साहित्य विक्री करणाऱ्यांची गर्दी असते. याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने सर्रास लावली जातात. यामुळे महामार्गावरून एकेरी वाहतूक करावी लागते.

फूटपाथ नाहीच

शहरातून जवळपास चार किमी महामार्ग जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फूटपाथ होणे गरजेचे असताना पालिकेतील आतापर्यंतच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले नाहीत. परिणामी या जागी अतिक्रमणे झालेली आहेत. कित्येक दुकानदार आपल्या दुकानासमोरील जागा हातगाडे व फेरीवाल्यांना भाड्याने देऊन पैसे कमवीत आहेत.

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

अतिक्रमणाबाबत जास्त गदारोळ झाल्यास पालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम चालू केली जाते. परंतु, यानंतर पुन्हा तिथे अतिक्रमण होऊ नये याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम ही नावालाच होत आहे असे दिसून येते.

कोट.......

शहरातील वाहनचालकांवर ना कोणाचे नियंत्रण आहे, ना पार्किंगसाठी कोठे जागा. वाहनांच्या बेशिस्तपणामुळे कधी अपघात होईल याची शाश्वती राहिली नाही. प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

- गजानन पाटील,नागरिक

शहराचा विस्तार, तसेच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यानुसार पार्किंगची सुविधा व वाहन चालविणाऱ्यांवर नियंत्रण प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर पालिकेतील लोकप्रतिनिधींनादेखील या समस्येची जाणीव नसल्याचे दिसून येते.

- बळीराम गायकवाड, नागरिक

‘पे अँड पार्किंग’ स्वरूपात शहरातील महामार्गालगत असलेल्या मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. बाजारपेठेत जाणाऱ्यांना या ठिकाणी वाहने पार्किंग करावी लागणार आहेत. याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहोत.

- रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी