शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:04 IST

बिहार निवडणुकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या मोस्ट वाँटेड सिग्मा गँगचा दिल्लीत एन्काउंटर

Delhi Encounter: बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी दिल्ली पोलिसांनी एका गुंड टोळीचा खात्मा केला आहे. बिहारमध्ये दहशत पसरवण्याचा कट रचणाऱ्या बिहारमधील चार कुख्यात गुंडांना दिल्ली पोलिसांनी आणि बिहार पोलिसांनी संयुक्त कारवाईत रोहिणी येथे झालेल्या चकमकीत ठार केले आहे. ठार झालेल्या गुंडांमध्ये 'सिग्मा अँड कंपनी' नावाच्या कुख्यात टोळीचा म्होरक्या रंजन पाठक याचा समावेश आहे.

२२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुमारे २:२० वाजता रोहिणी परिसरातील बहादुर शाह मार्ग, डॉ. आंबेडकर चौक ते पंसाली चौक या दरम्यान ही चकमक झाली. दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचला हे गुंड दिल्लीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलीस पथक सांगितलेल्या ठिकाणी तपासणी करत असताना गुंडांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. यावेळी पोलीस आणि गुंडांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत चारही गुंडांना गोळ्या लागल्या आणि त्यांना उपचारासाठी रोहिणी येथील डॉ. बीएसए रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या गोळीबारात दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचचे इन्स्पेक्टर अरविंद, एसआय मनीष आणि एसआय नवीन यांच्यासह चार पोलिसांच्या बुलेटप्रूफ जॅकेटला गोळ्या लागल्या, मात्र ते बचावले. एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या गुंडांमध्ये रंजन पाठक (२५), बिमलेश महतो उर्फ बिमलेश साहनी (२५), मनीष पाठक (३३) आणि अमन ठाकूर (२१) यांचा समावेश आहे. यापैकी रंजन, बिमलेश आणि मनीष हे बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी होते, तर अमन ठाकूर दिल्लीतील करावल नगर येथील होता.

बिहारच्या पोलीस महासंचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे गुंड 'सिग्मा अँड कंपनी' नावाने कुख्यात होते आणि त्यांचा म्होरक्या रंजन पाठक होता. हा टोळी नेपाळपासून बिहारपर्यंत कार्यरत होता. कॉन्ट्रॅक्ट किलर म्हणून काम करणारी टोळी बिहारमध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये, विशेषतः ५ हून अधिक मोठ्या हत्याकांडांमध्ये वाँटेड होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही टोळी बिहारमध्ये मोठ्या कारवाया करून दहशत माजविण्याचा कट रचत होती. या कटाची माहिती एका ऑडिओ कॉलवरून पोलिसांना मिळाली होती. या टोळीने नुकतीच ब्रह्मर्षी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश शर्मा यांची हत्या केली होती, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.

गुन्हे केल्यानंतर रंजन पाठकची गँग दिल्लीत येऊन लपत होती. याच गुप्त माहितीच्या आधारे बिहार पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचशी संपर्क साधून संयुक्त ऑपरेशन यशस्वी केले. रंजन पाठक हा तोच गुंड आहे, ज्याने सीतामढीतील एका हत्याकांडानंतर माध्यमांना स्वतःचा बायोडाटा पाठवून दहशत निर्माण केली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Encounter: Contract Killers Eliminated; Bihar Election Plot Foiled

Web Summary : Delhi Police neutralized four contract killers plotting terror in Bihar before elections. The 'Sigma & Company' gang, led by Ranjan Pathak, was wanted in multiple murders. A joint operation eliminated them in Rohini after a shootout. They aimed to disrupt the Bihar elections.
टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५