शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 00:07 IST

निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. 'या नराधमांना फाशी द्या' किंवा 'त्यांनाही जिवंत जाळून टाका,' अशी एकच मागणी सर्वांकडून केली जात आहे. निक्कीच्या कुटुंबीयांना आशा आहे की, त्यांच्या मुलीला न्याय मिळेल. निक्कीचे वडील भिखारी सिंह यांनी, "अशा लोकांच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे. जावई आणि मुलीच्या सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे," असे म्हटले. माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

पंचायतीच्या निर्णयामुळे मुलीला परत सासरी पाठवले!

निक्कीच्या वडिलांना विचारण्यात आले की, 'जर निक्कीला वारंवार हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, तर तुम्ही तिला परत घरी का आणले नाही?' यावर त्यांनी सांगितले की, "आमच्या समाजात पंचायत बसते आणि तीच काय करायचे ते ठरवते. जेव्हा मला कळले की, निक्कीला त्रास दिला जात आहे, तेव्हा मी तिला घरी आणले होते. तेव्हा येथे पंचायत बसली. जावई विपिन भाटी आणि त्याच्या कुटुंबालाही बोलावले गेले. त्यांनी निक्कीला यापुढे त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले. त्यावर पंचायतीने निक्कीला परत सासरी पाठवण्याचा निर्णय दिला. पण त्यानंतरही जावई आणि मुलीच्या सासूने माझ्या मुलीचा छळ सुरूच ठेवला."

त्यांच्यावर बुलडोझर चालवा!

निक्कीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, "आम्ही मुलींना खूप लाडाने वाढवले होते. त्या आमच्यावर कधीच ओझं नव्हत्या. आम्ही दोन्ही मुलींना डीपीएस शाळेत शिकवले. थाटामाटात त्यांचे लग्न केले. सासरच्या लोकांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता केली. निक्की स्वतः चांगली कमाई करत होती. तिने ब्युटिशियनचा कोर्स केला होता आणि महिन्याला एक लाख रुपये कमवत होती. पण तो पैसाही विपिन ठेवून घ्यायचा, कारण तो स्वतः काहीच काम करत नव्हता. त्याचे काम फक्त फिरणे आणि मुली पटवणे हेच होते."

"योगीजी नेहमी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' असे म्हणतात. आता जेव्हा मुलींसोबत असे घडत आहे, तेव्हा विपिनसारख्या लोकांच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे. त्यांना फाशी दिली गेली पाहिजे. विपिनच्या गर्लफ्रेंड्सशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, फक्त विपिन आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.

"प्रत्येक वडिलांचे कर्तव्य असते की मुलीला चांगले शिक्षण द्यावे. आम्ही ते कर्तव्य पूर्ण केले. लग्नानंतर मुलगी सासरच्यांची जबाबदारी असते. त्यांनी तिला मुलीसारखेच वागवायला हवे. पण माझ्या मुलीला तर या नराधमांनी हुंड्यासाठी मारून टाकले," असे म्हणताना निक्कीच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीhusband and wifeपती- जोडीदार