शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाच्या खटल्यातून पती व सासरा निर्दोष मुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 07:14 IST

सात वर्षांपूर्वी पुण्यात भररस्त्यात आपल्या पती व सासऱ्याने आपला विनयभंग केला व मारहाण करून जखमी केले अशा आरोपावरून एका महिलेने दाखल केलेल्या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

मुंबई: सात वर्षांपूर्वी पुण्यात भररस्त्यात आपल्या पती व सासऱ्याने आपला विनयभंग केला व मारहाण करून जखमी केले अशा आरोपावरून एका महिलेने दाखल केलेल्या खटल्यात पुणे सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली
आहे.
पुण्यात राहणाºया डॉ. सारिका रानडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबर २०१२ रोजी नोंदविलेल्या फिर्यादीवरून श्रीश सोसायटी, हाजुरी दर्गा रोड, ठाणे (प.) येथे राहणारे त्यांचे दाताचे डॉक्टर असलेले पती डॉ. अक्षय रानडे (४३ वर्षे) व सासरे अरुण रानडे (७२) यांच्यावर हा खटला गुदरण्यात आला होता. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या दोघांना भादंवि कलम ३५४( विनयभंग) व ३२३ (मारहाण करून इजा करणे) या गुन्ह्यांसाठी दोषी ठरवून अनुक्रमे एक वर्ष व एक महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध केलेले अपील मंजूर करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ आर. वाघमारे यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

न्यायाधीश वाघमारे यांनी सादर झालेल्या साक्षीपुराव्यांचे बारकाईने विश्लेषण करून असे नमूद केले की, स्वत: फिर्यादीची जबानी व अभियोग पक्षाच्या साक्षीदारांच्या साक्षी यांच्यात विसंगती व तफावत दिसते. या साक्षी वैद्यकीय पुराव्यांशीही जुळत नाहीत फार तर आरोपी व फिर्यादी यांच्यात बाचाबाची व झोंबाझोंबी झाल्याचे घटनाक्रमावरून दिसते. शिवाय पतीने विनयभंग केल्याची फिर्यादीची मुळात तक्रारच नाही. सासºयांच्या ज्या कृतीने तिने विनयभंगाचा आरोप केला आहे ती कृती त्यांनी विनयभंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून केली, असे म्हणता येत नाही.

अक्षय व सारिका या डॉक्टर दाम्पत्याचा फेब्रुवारी २००३ मध्ये विवाह झाला. त्यांना सिया नावाची मुलगी असून ती पुण्यात सेंट हेलेना’ज शाळेत शिकते. दाम्पत्यात वैवाहिक कलह सुरु असून पत्नी सासरी राहात नाही. सारिका यांनी पती व सासºयांविरुद्ध हुंड्यासाठी छळाचा व कौटुंबिक हिंसाचाराचा खटलाही दाखल केला आहे. सारिकाला पुन्हा सासरी नांदायला पाठवावे यासाठी अक्षय यांनी केलेले प्रकरण कौटुंबिक न्यायालयात सुरु असून त्यात त्यांना आईसोबत राहणाºया मुलीला भेटण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

या खटल्यात सारिका यांचा आरोप असा होता की, १४ सप्टेंबर २०१२ रोजी दुपारी सियाची शाळा सुटली तेव्हा तिला घरी नेण्यासाठी
आपण गेलो होतो. तेव्हा पती व साररेही तेथे आले. पती सियाला बळजबरीने आपल्याबरोबर ओढून नेऊ लागला. त्याला विरोध केल्यावर
पती व सास-याने भररस्त्यात आपला विनयभंग केला व आपल्याला आणि ड्रायव्हरला मारहाण केली. शाळेचे वॉचमन लोंढे व शाळेच्या बसचे ड्रायव्हर देशमुख यांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिलेली असूनही अभियोग पक्षाने नि:ष्पक्ष साक्षीदार म्हणून त्यांची साक्ष काढली नाही, असा प्रतिकूल अभिप्राय न्यायालयाने नोंदविला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय