शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा विळखा, शेतकऱ्यांनी अजगराच्या तावडीतून हरणाची केली सुटका, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 19:20 IST

या भागात नेहमी गुरे चारण्यासाठी आणली जातात. आता अजगर याच भागात दिसल्याने शेतकरी, पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

लाडसावंगी (औरंगाबाद): औरंगाबाद तालुक्यातील अंजनडोह येथील पाझर तलावाजवळ २१ सप्टेंबर रोजी दुपारी एक अजगर हरणास वेढा मारून गिळत असल्याचे गुरे चारणाऱ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काठीने हरणाची सुटका केली; परंतु तोपर्यंत हरणाचा मृत्यू झाला होता.

औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी चौका महामार्गावर अंजनडोह शिवारातील पाझर तलावाजवळ २१ सप्टेंबर रोजी दुपारी गुरे चारणारे शेतकरी तलावाच्या मागील बाजुस वन विभागाच्या डोंगराच्या पायथ्याशी गुरे चारत होते. यावेळी झाडांमध्ये दगडाच्या कपारीत एका अजगराने हरणाला वेढा मारल्याचे दिसले. जवळ जाऊन या शेतकऱ्यांनी पाहिले असता जवळपास अर्धे हरिण या अजगराने गिळाल्याचे दिसून आले. यावेळी या शेतकऱ्यांनी अजगरास काठी मारण्यास सुरूवात केली. त्यानंतर काही वेळाने अजगराने हरणास सोडण्यास सुरूवात केली. काही वेळाने पूर्ण हरिण अजगराच्या तोंडातून बाहेर आले. त्यानंतर अजगर वनविभागाच्या डोंगराकडे निघून गेले. 

या हरणाजवळ हे शेतकरी गेले असता त्यांना हरण मृतावस्थेत दिसून आले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मयत हरणास पाझर तलाव परिसरात खड्डा खोदून पुरून टाकले. त्यानंतर ते निघून गेले. दरम्यान, या भागात नेहमी गुरे चारण्यासाठी आणली जातात. आता अजगर याच भागात दिसल्याने शेतकरी, पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. धरण परिसरात शेतातील खरिपाचे पिके सोंगणीला आल्याने मजुर वर्ग त्या भागात येण्यास तयार होत नाही. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या अजगरास पकडून दुसरीकडे सोडण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादagricultureशेतीFarmerशेतकरीforestजंगल