शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
6
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
7
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
8
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
9
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
10
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
11
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
12
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
13
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
14
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
15
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
16
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
17
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
18
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
19
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
20
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाचा कहर! छत्रपती संभाजीनगर ४२.५ अंश सेल्सिअसवर; पाच दिवसांत ३.१ अंशांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:55 IST

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे.

छत्रपती संभाजीनगर : पाच दिवसांपासून शहर व परिसरावर सूर्य आग ओकत आहे. बुधवारने मागील चार दिवसांतील तापमानाचा उच्चांक गाठला. ८ एप्रिलपर्यंत मागील तीन दिवसांतील तापमानाचे रेकॉर्ड मोडल्यानंतर बुधवारी कमाल तापमान ४२.५ अंश सेल्सिअसपर्यंत नाेंदविले गेले. ९ अंशांनी तापमान वाढले, यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. 

दरवर्षी एप्रिलअखेर आणि वैशाखाच्या सुरुवातीपूर्वी एवढे तापमान असते. तो आकडा एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतच गाठल्याने पुढील काळात काय होणार, याची चिंता आहे. जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, पुढील काही दिवस उष्णतेची लाट राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी वाढ हाेत तापमान ४२.५ अंशांवर पाेहोचले, जे सरासरीपेक्षा जास्त होते. परिणामी, रात्रीच्या तापमानातही वाढ होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्ड ब्रेक ४२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. वाढलेल्या तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य होते. तापमान झपाट्याने वाढत असल्यामुळे दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

तापमान वाढत जाईल...
एप्रिलअखेरचे तापमान पहिल्याच आठवड्यात झाले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शासनानेदेखील तातडीने जनजागृती मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.
प्रा. किरणकुमार जोहरे, हवामानशास्त्रज्ञ

पाच दिवसांत ३.१ अंशांनी वाढले तापमान
तारीख- कमाल-किमान

५ एप्रिल - ३९.४ -२२.६
६ एप्रिल - ४०.२ -२३.३
७ एप्रिल- ४१.०- २४.१
८ एप्रिल- ४१.६- २६.२
९ एप्रिल- ४२.५ - २५.०

५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष
वाढत्या तापमानामुळे जि.प. सीईओ अंकित यांनी जिल्ह्यातील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन औषधसाठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दरवर्षी एप्रिल ते जून या महिन्यात उष्माघाताचा प्रादुर्भाव होतो, तसेच त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्यातच आतापासूनच जिल्ह्यात कमाल तापमान वाढत चालल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHeat Strokeउष्माघात