शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

लाखावरच बोळवण !

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड जिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यात सतत पडणारा दुष्काळ अन् यातून येणारे नैराश्य यामुळे जिल्हयातील बळीराजा पुरता कोलमडून पडलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. १ जानेवारी २०१४ ते २८ जून २०१४ या सहा महिन्याच्या कालावधीत जिल्हयातील ५५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतीची नापिकी व गारपीट यामुळे आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखाची मदत शासनाने केली आहे. मात्र एक लाखाच्या मदतीने आत्महत्या थांबतील का असा प्रश्न जिल्हयातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहिया यांनी उपस्थित केला आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जात असले तरी देखील या योजनांचा शेतकऱ्यांना उभा रहाण्यासाठी काहीच उपयोग होत नसल्याचेच शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारी वरून स्पष्ट होते. ८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे पडताळणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत शेतकऱ्यांने खरोखरच नापिकी व कर्जबाजारीपणामुळेच आत्महत्या केली आहे का? हे पडताळून पाहण्यात आले. शेतकरी आत्महत्येची वेगवेगळी कारणे सांगण्यात आलेली आहेत. शासन समुपदेशन करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र समुपदेशनाच्या पलीकडे जाऊन शासनाने काम करणे आवश्यक असल्याचे मानवलोक संस्थेचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते द्वारकादास लोहीया यांनी सांगितले.शेतीसाठी कर्ज मिळविण्यासाठी बँकाची उंबरटे झिजवून देखील बँका दारात उभ्या करत नाहीत. अलीशान वाहने घेण्यासाठी सहज कर्ज उपलब्ध होऊ शकते मात्र शेतकऱ्यांना शेतात पाईपलाईन करण्यासाठी कर्ज मागितले तर किमान २५ बँकाचे ना हारकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. पंचायत समिती मार्फत अल्प भू धारक शेतकऱ्यांना विविध औजारे दिली जातत. ही औजारे योग्य व गरजू शेतकऱ्यांपर्यंत जातात का? हे पहाणारी यंत्रणा आज तरी जिल्हा प्रशासनाकडे नाही. याचाच फायदा घेऊन ‘लँड लॉर्ड’ लॉबी शासनाच्या विविध योजना खाऊन टाकत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. शेतकऱ्यांनी कर्जबाजारी पणामुळे आत्महत्येचा मार्ग स्विकारू नये असे उप जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.गेवराई तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याजिल्ह्यात ५५ पैकी ३७ आत्महत्याग्रस्त शेतकरी शासन मदतीस पात्र ठरले आहेत. १४ शेतकरी अपात्र आहेत. तसेच गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याचा अहवालच जिल्हा प्रशासनाकडे आला नाही तर गेवराई येथीलच एक शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रस्ताव फेर चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे. शेतकरी आत्महत्येचा अहवाल पाहता एकट्या गेवराई तालुक्यात मागील सहा महिन्यात नापिकी, गारपिटीचे संकट यामुळे १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आष्टी तालुक्यात २ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे.फक्त ३७ कुटुंबियांना मिळाली मदतजानेवारी २०१४ ते जून २०१४ दरम्यान झालेल्या शेतकरी आत्महत्या तालुकापात्रअपात्रअहवाल प्राप्त नाहीबीड०७०४००परळी०२०१००गेवराई१२०४०२पाटोदा०४०००१अंबाजोगाई०३०१००धारूर०५०१००केज०१०१००माजलगाव०००१००शिरूर कासार०००१००वडवणी०१००००आष्टी०२००००