शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

तीन कृषी कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:19 IST

औरंगाबाद : तीन कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, किमान हमीभाव कायदा झालाच पाहिजे, शेतकरी, शेतमजुरांच्या एकजुटीचा विजय असो, अशा ...

औरंगाबाद : तीन कृषी कायदे रद्द झालेच पाहिजेत, किमान हमीभाव कायदा झालाच पाहिजे, शेतकरी, शेतमजुरांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देत शहरात २६ जानेवारी रोजी किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली शांततेत पार पडली.

दिल्ली गेट येथून दुपारी तीनच्या दरम्यान रॅलीला सुरुवात झाली. यात ५ ट्रॅक्टर, १० चारचाकी वाहने व २० दुचाकींसह शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते सहभागी झाले होते. अग्रभागी असलेले ट्रॅक्टर सजविण्यात आले होते. ३ कृषी कायदे करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. दिल्लीत शेतकरी दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत, त्यास पाठिंबा देण्यासाठी औरंगाबादेत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली असल्याची माहिती लाल बावटा शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष तथा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ. प्रा. राम बाहेती यांनी दिली. हरचरण सिंग गुलाटी, जयमालसिंह रंधवा, मनोहर टाकसाळ, इक्बाल सिंग गिल, जकीया बेगम, सरदार हरि सिंग, नवीन ओबेराय यांनी झेंडा दाखवून रॅली सुरू केली. दिल्ली गेट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक, आमखास मैदान मार्गे भडकलगेट चौकात रॅली पोहोचली. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव गणेश कसबे, भाकपचे जिल्हा सचिव अशफाक सलामी, सहसचिव अभय टाकसाळ यांची यावेळी उपस्थिती होती.

दिल्ली येथे सुरू असलेल्या ट्रॅक्टर रॅलीवर जो गोळीबार करण्यात आला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीमार करण्यात आला, त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याला आदरांजली वाहण्यात आली.

दिल्ली येथून आंदोलनात सहभागी होऊन परतलेले शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुक्याचे मोबीन बेग, इरफान शेख, किसान सभेचे सिल्लोड तालुका अध्यक्ष बाळू शिंदे, शेतमजूर युनियनचे फुलंब्री तालुका अध्यक्ष विठ्ठल आव्हाड आदींची उपस्थिती होती.

कॅप्शन

किसान सभा व शेतमजूर युनियनच्यावतीने काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली.