शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रतीक्ष़ा ‘त्या’ कॉलची

By admin | Updated: May 31, 2014 01:25 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोध समितीकडे मुलाखती दिलेल्या देशभरातील २७ प्राध्यापकांपैकी पाच जणांना राज्यपालांकडून बोलाविण्यात येणार आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोध समितीकडे मुलाखती दिलेल्या देशभरातील २७ प्राध्यापकांपैकी पाच जणांना राज्यपालांकडून बोलाविण्यात येणार आहे. समितीने पाच जणांची नावे असलेला बंद लिफाफा राज्यपालांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे मुलाखत दिलेल्या सर्व उमेदवारांनी आता राज्यपालांकडून कधी बोलावणे येते, याची प्रतीक्षा सुरू केली आहे. अधिक माहिती अशी की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे हे २८ मार्च रोजी निवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर नवीन कुलगुरूंची निवड करण्यासाठी राज्यपालांनी जानेवारीमध्ये कुलगुरू शोध समिती स्थापन केली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले. प्राप्त ६५ अर्जांपैकी २९ जणांना २९ मे रोजी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. २९ मे रोजी मुंबई विद्यापीठातील कलिना सभागृहात शोध समितीने २७ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये औरंगाबादेतील सात प्राध्यापकांचा समावेश आहे. समितीने कुलगुरुपदासाठी योग्य वाटलेल्या पाच जणांची नावे राज्यपालांना गुरुवारी रात्रीच कळविली. गुरुवारी जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला. या शपथविधीमुळे राज्यपाल के. शंकरनारायण व्यग्र होते. शुक्रवारी ते पाच उमेदवारांशी संवाद साधतील, अशी अपेक्षा होती. त्यामुळे तेथे मुलाखतीसाठी गेलेले सर्व उमेदवार मुंबईतच होते. शुक्रवारी दिवसभर कोणत्याही उमेदवारास राजभवानातून बोलावणे आले नाही. त्यामुळे आता गावी परतावे अथवा नाही, या संभ्रमावस्थेत उमेदवार सापडले. त्यामुळे अनेकांनी राज्यपालांकडून पाच जणांना बोलवणे येईपर्यंत मुंबईतच मुक्कामी राहण्याचे ठरविल्याचे सूत्राने सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू शोध समितीने २७ उमेदवारांच्या मुलाखती घेऊन पाच जणांची नावे राज्यपालांना कळविली आहेत.कुलगुरू निवडीचा चेंडू राज्यपालांच्या कोर्टात असल्याने विद्यापीठातील चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांपासून ते विविध विभागप्रमुखांचे लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे लागले आहे. विद्यापीठाला भूमिपुत्र कुलगुरू मिळतो किंवा बाहेरचा यावर जोरदार चर्चा केली जात आहे.