शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

संमती नसताना शासनाने घेतल्या ताब्यात जमिनी

By admin | Updated: May 11, 2014 23:59 IST

परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे.

 परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेतकर्‍यांची संमती नसतानाही जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी माकप व किसान सभेने केली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, निम्न दुधना प्रकल्पातील कालव्यातील जाणार्‍या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना बाजारभावाप्रमाणे द्यावा यासाठी २००९ पासून माकप व किसान सभेचे कॉ.रामेश्वर पौळ, लिंबाजी कचरे, रामकृष्ण शेरे, उद्धव पौळ, धोंडीराम पौळ, लक्ष्मणराव मुळे, माणिक मुळे, हिंमतराव बारहाते, ज्ञानेश्वर पौळ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे. प्रशासनाने वेळोवेळी दबावतंत्राचा वापर करुन काही शेतकर्‍यांना केवळ ४८ हजार रुपये प्रति एकर मावेजा देऊन संमत्या घेतल्या. परंतु, बर्‍याच शेतकर्‍यांनी आजपर्यंत संमती दिली नाही व मावेजाही घेतला नाही. या प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या समवेत अनेकवेळा बैठका झाल्या. केंद्र शासनाच्या २०१३ च्या भूमी अधिग्रहणाचा नवीन कायदा जानेवारी २०१४ पासून लागू झाला. या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या तीनपट रक्कम शेतकर्‍यांना जमिनीची किंमत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार मार्च २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ज्या शेतकर्‍यांनी जमीन देण्यासाठी संमती दिली नाही अथवा मावेजा घेतला नाही, अशा शेतकर्‍यांना नवीन कायदा लागू करा, असा आदेश असताना निम्न दुधना प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नवीन कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. याउलट ८ मे २०१४ रोजी रात्री डिग्रस व इरळद या परिसरात १४४ कलम लावून शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या दडपशाहीच्या जोरावर अधिकार्‍यांनी काम सुरु करुन शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. याप्रकरणी संमती नसताना जमिनी ताब्यात घेणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा शेतकर्‍यांचा या प्रकल्पाला विरोध नाही. परंतु, जमिनीची किंमत अत्यल्प दिली जात आहे. त्यास शेतकर्‍यांचा विरोध आहे. आज या जमिनीचा बाजारभाव एकरी १५ लाख रुपयांपेक्षा जास्त असताना सरकार केवळ ४८ हजार रुपये प्रतिएकर देऊन शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाजारभावाच्या तीनपट जमिनीला मोबदला द्यावा, परिसरात लागू केलेले १४४ कलम रद्द करावे आदी मागण्या माकप व किसान सभेने केल्या आहेत.