शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलीची सुटका

By admin | Updated: May 8, 2014 00:22 IST

औरंगाबाद : काबरानगर येथे घरासमोर खेळत असताना शनिवारी (दि. ३ मे) अपहरण झालेल्या मशिरा फातेमा ऊर्फ खुशी या पाचवर्षीय चिमुकलीची सुटका करण्यात जवाहरनगर पोलिसांना यश आले.

औरंगाबाद : काबरानगर येथे घरासमोर खेळत असताना शनिवारी (दि. ३ मे) अपहरण झालेल्या मशिरा फातेमा ऊर्फ खुशी या पाचवर्षीय चिमुकलीची सुटका करण्यात जवाहरनगर पोलिसांना यश आले. काही दिवसांपूर्वी काबरानगर येथे घराशेजारी राहणार्‍या आरोपीनेच तिचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अपहरणकर्त्याच्या पत्नीला अटक केली असून तो फरार झाला आहे. मशिरा ही ३ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घरासमोर खेळत असताना आरोपी सय्यद रफिक सय्यद रसूल (४०, रा. जटवाडा रोड) याने तिचे अपहरण केले होते. हडको कॉर्नर येथे राहणार्‍या शेख आजम या नातेवाईकाच्या घरी त्याने मशिराला ठेवले होते. मशिरा ही स्वत:ची मुलगी असून दुसर्‍या दिवशी तिला घेऊन जातो असे सांगून तो तेथून निघून गेला होता. सय्यद रफिक सय्यद रसूल याने ३ मे रोजी मशिराला घरासमोरून उचलून नेले आणि तिच्या आईला फोन करून मशिराच्या मावशीसोबत लग्न लावून द्या आणि चिमुरडीला घेऊन जा असे सांगितले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अनोळखी अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद इंगळे, पोहेकॉ ठोंबरे, शेख मशुद्दीन, गोरे, ठाकूर यांनी आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन काढून त्याचा शोध सुरू केला. त्याचे वर्णन केवळ चिमुरडीच्या वडिलांनाच माहीत होते. त्यांना सोबत घेण्यात आले होते; मात्र तो सापडत नव्हता. त्यानंतर जटवाडा रोडवरील वीटभट्टीवर जाऊन त्याची पत्नी सय्यद रुकसाना हिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा तिने पोलिसांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र तिला पोलिसी खाक्या दाखविताच आरोपी पतीने मशिरा हीस हडको कॉर्नर येथे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास आजम खान यांच्या घरातून मशिरा हीस ताब्यात घेतले. ती सुखरूप असून आरोपीने आजमखान यांना खोटे सांगून त्या मुलीला त्यांच्या घरी ठेवल्याचे समजले. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपीला पाठीशी घालणार्‍या रुकसाना हीस पोलिसांनी अटक केली आहे. दोन बायकांचा दादला दोन बायकांचा दादला असलेला आरोपी जटवाडा रोडवरील वीट भट्टीवर राहतो. आरोपी हा मशिराच्या घराशेजारी काही दिवस राहत होता. त्या काळात त्याने चिमुरडीच्या मावशीसोबत लग्न करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आधीच दोन बायकांचा दादला असलेल्या आरोपीसोबत आपल्या बहिणीचे लग्न लावून देण्यास मशिराच्या आईने नकार दिला होता. त्याचा आरोपीला राग आला होता.