शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

केबीसीने घातला कोट्यवधींचा गंडा

By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST

विजय चोरडिया, जिंतूर अल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़

विजय चोरडिया, जिंतूरअल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे मात्र अडकून पडले आहेत़ मागील दोन वर्षांपासून केबीसीने जिंतूर तालुक्यात जोरदार मार्केटींग केले़एजंटांची साखळी निर्माण करून ग्रामीण भागापर्यंत एजंटांचे जाळे नेमले़ १७ हजार २०० रुपयांत ५१ हजार रुपये मिळवा किंवा ८६ हजारांत ३ लाख ६ हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले़ तालुक्यामध्ये ४० ते ५० एजंट असून, १ हजारापेक्षा जास्त लोकांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे़ हा आकडा १० कोटीपेक्षा जास्त आहे़ १ महिन्यापूर्वी केबीसीने गाशा गुंडाळला हे जवळपास निश्चित झाले होते़ तेव्हापासूनच गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास कमी झाला़ परंतु, एजंटांनी गुंतवणूक करताना वेगवेगळी आमिषे दाखविली़ काही एजंटांनी स्वत: जबाबदारी घेऊन पैसे बुडाले तर परत करू असे आश्वासन दिले होते़ यामुळे लोकांनी विश्वास ठेऊन कोट्यवधी गुंतवले़ याचाच परिणाम कंपनीला मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळाल्याने ही रक्कम घेऊन कंपनीचे मुख्य संचालक व अन्य पसार झाले आहेत़ विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत केबीसीचे जाळे पोहचले आहे़ प्रत्येक गावातून किमान २० त २५ नागरिकांनी यात गुंतवणूक केली़ काहींनी घरातील किडूनमिडूक विकून तर काहींनी दागिने गहान ठेऊन तर काहींनी व्याजबट्टयाचे पैसे शेती गहान ठेऊन काढले व केबीसीत गुंतवले़ केबीसीने आता पोबारा केल्यामुळे या नागरिकांपुढे कर्ज फेडण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे़एजंट आले गोत्यात तालुक्यातील नागरिकांनी कंपनीत पैसे गुंतविताना एजंटाच्या भरोस्यावर गुंतवणूक केली होती़ गुंतवणुकीच्या वेळी एजंटांनी पैसे परत करण्याचे आमिष संबंधितांना दिले होते़ आता कंपनी बुडाल्याने गुंतवणूकदार एजंटाच्या दारात खेटे घालत आहेत़ एजंटांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखविल्यानेच कोट्यवधी रुपयांना गुंतवणूकदार बुडाले आहेत़ गुंतवणुकीत महिलांचे प्रमाण जास्तकेबीसी कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवली़ त्यात महिलांचे प्रमाण मोठे आहे़ अनेक महिलांनी घरच्या मंडळींना अंधारात ठेऊन गुंतवणूक केली तर काहींनी स्वत:चे दागिने परस्पर ठेऊन कंपनीत पैसे भरले़ कंपनी बंद पडल्याने या महिलांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे़