शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

गारपीटग्रस्तांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By admin | Updated: July 16, 2014 00:46 IST

सेलू : रबी हंगामाची पिके जोमात असताना अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली़

सेलू : रबी हंगामाची पिके जोमात असताना अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर शासनाने या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली़ तालुका कृषी अधिकारी कार्यालय व महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चुकीचे पंचनामे केल्यामुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी राम रोडगे व तहसीलदार आसाराम छडीदार यांना घेराव घालून सोमवारी हे आंदोलन केले़ मार्च महिन्यात सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती़ त्यामुळे शेतातील रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व भाजीपाला व फ ळबागा उद्ध्वस्त झाल्या होत्या़ त्यानंतर महसुल विभाग व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले़ परंतु, अनेक शिवारातील पंचनामे चुकीच्या पध्दतीने करण्यात आले़ नुकसान झालेले असतानाही पंचनामे करताना चुका झाल्यामुळे शेकडो शेतकरी शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहिले़ तालुक्यातील रायपुर, खैरी, सावंगी, निरवाडी, गिरगाव, चिकलठाणा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करताना दुजाभाव केल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले, काही शेतकऱ्यांना मोठे नुकसान होऊनही तुटपुंजे अनुदान मिळाले त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांना धारेवर धरत तहसीलदार आसाराम छडीदार यांनाही जाब विचारला़ रायपुर परिसरातील शेकडो शेतकरी सोमवारी तहसील कार्यालयात दाखल झाले़ नुकसान होवूनही पंचनामे करताना दुजाभाव केल्यामुळे आम्हाला अनुदान मिळाले नाही दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत आम्ही काय करावे असा संतप्त सवालही या शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ यावेळी रायपुरचे सरपंच सुंदर गाडेकर, चिकलठाण्याच्या सरपंच कमलबाई लोखंडे, रामेश्वर गाडेकर, गुलाब रोडगे, सचिन गाडेकर, राजेंद्र गाडेकर यांच्यासह या परिसरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले़ (प्रतिनिधी)चुकीच्या पंचनाम्यामुळे शेतकरी वंचिततालुक्यात मार्च महिन्यात प्रचंड गारपीट झाली परिणामी शेकडो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली़ त्यानंतर प्रशासनाच्या वतीने पंचनाम्याचे काम सुरू झाले़ परंतु, महसुल व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे पंचनामे करताना गांभीर्याने काम केले नाही़ त्यामुळे नुकसान होवूनही अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले़ तर काही शेतकऱ्यांना तुटपुंजे अनुदान मिळाले़ याद्या जाहीर झाल्यानंतर ही वंचित शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे खेटे मारले़ परंतु, त्याचा उपयोग झाला नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले़