शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

हमी केंद्रावर हरभरा पिकाचे वजन रखडले

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

कळंब : कळंब येथे नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्रावर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या हरभऱ्याचे वजन आणखीही करण्यात न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कळंब : कळंब येथे नाफेडमार्फत सुरु करण्यात आलेल्या हरभरा हमीभाव खरेदी केंद्रावर काही शेतकऱ्यांनी दिलेल्या हरभऱ्याचे वजन आणखीही करण्यात न आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच यामध्ये हात धुवून घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.कळंब येथे नाफेडमार्फत हरभरा हमी भाव खरेदी केंद्र एप्रिल २०१४ मध्ये कळंब तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले होते. तालुक्यातील १२८ शेतकऱ्यांनी १० मे २०१४ पर्यंत या केंद्रावर ५ ते ६ हजार क्विंटल हरभरा खरेदीसाठी दाखल केला होता. यातील काही शेतकऱ्यांचा हरभरा संबंधित यंत्रणांनी जमा करुन घेतला. परंतु त्याचे वजनमापेच न केल्याने त्या शेतकऱ्यांना अजूनही हरभऱ्याचे पैसे मिळाले नाहीत. हा हरभरा खरेदी-विक्री संघाने डिकसळ येथील गोदामात ठेवला असून, पैशासाठी या शेतकऱ्यांची फरफट चालूच आहे.शेतकऱ्यांची झाली हेळसांडया खरेदी केंद्रावर आलेल्या काही शेतकऱ्यांनी हरभरा वजन मापे करण्यासाठी दिला होता. परंतु अनेक दिवस प्रतीक्षा करुनही त्याचे वजनमाप न झाल्याने काही शेतकऱ्यांनी कंटाळून हरभरा परत नेला. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते, अशी माहितीही काही शेतकऱ्यांनी दिली. (वार्ताहर)हरभरा खरेदीमध्ये संबंधित यंत्रणांनी खुल्या बाजारात अत्यल्प दराने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला हरभरा या केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर जमा करुन घेतला. लागोलाग त्याची वजनमापे करुन त्यांचे पैसेही दिल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतो आहे. परंतु शेतकऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करुनही हरभऱ्याचे वजनही झाले नाही आणि पैसेही मिळाले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. काही राजकीय पुढाऱ्यांनीही या हमीभावात कमाई करुन घेतल्याची चर्चा आहे.या हमीभाव खरेदी केंद्रावरील सावळा गोंधळ गोरोबा माळी (गौर), दादासाहेब देशामुख (गौर), दिलीप पाटील (गौर) व सुंदरराव लोमटे (जवळा खु.) या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार तसेच जिल्हाधिाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या शेतकऱ्यानंतर इतरांनी दिलेल्या हरभऱ्याचे वजन या यंत्रणांनी केले, त्याचे पैसेही अदा झाले, परंतु या शेतकऱ्यांचा माल अजूनही पडून असल्याचे त्यांनी प्रशासनाला कळविले होते. याची दखल घेवून हे प्रकरण संवेदनशील असून, त्याबाबत त्वरित कार्यवाही करावी, असे पत्र कळंब तहसीलदारांनी १२ आॅगस्ट २०१४ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले होते. त्यावर अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही.हरभऱ्याचे पैसे देणे अशक्य : कावळे४हमीभाव खरेदी केंद्रावर दाखल केलेल्या हरभऱ्याचा पंचनामा नाफेडमार्फत करण्यात आला. परंतु त्याची प्रतवारी व्यवस्थित नसल्याने त्या मालाचे वजन करण्यात आले नाही. तो माल अजूनही गोदामात पडून आहे. हा माल जवळपास दीडशे क्विंटलच्या आसपास आहे. या मालाचे पैसे देणेही शक्य नाही. खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांच्या मालाला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे कळंब तालुका खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक कावळे यांनी सांगितले.