शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुधनाच्या पाण्याचा शेतकर्‍यांना लाभ द्या

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

मोहन बोराडे, सेलू निम्नदुधना प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा करण्यात आला आहे़

मोहन बोराडे, सेलू निम्नदुधना प्रकल्पात यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा करण्यात आला आहे़ यामुळे दुधना काठावरील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होण्यासाठी दुधना पात्रात पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे़ यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे निम्नदुधना प्रकल्पात ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला़ प्रकल्पात पाणी अडविल्यामुळे दुधना नदीचे पात्र कोरडेठाक राहिले़ परिणामी दुधना काठावरील गावांना पाणीटंचाईचा फटका बसत आहे़ दुधना काठावरील गावांना नदी पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येतो़ अनेक गावांना पाणीपुरवठा करणार्‍या विहिरी पात्रात घेण्यात आलेल्या आहेत़ यावर्षी पात्र कोरडे राहिल्यामुळे पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींची पाणीपातळी काही दिवसांपासून खालावली आहे़ परिणामी पाणीपुरवठा करण्यास ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण झालेल्या आहेत़ दुधना काठावरील पिंपरी खुर्द, पिंपरी बु़, शिराळा, खुपसा, खेर्डा, रोहिणा, हादगाव पावडे, गोमे वाकडी, मोरेगाव, हादगाव आदी गावच्या ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन दुधना प्रकल्पातून नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली आहे़ बारा महिने दुधना पात्र कोरडे पडल्यामुळे दुधना काठावरील गावांमध्ये पाणी पातळीत घट झाली आहे़ त्यामुळे दुधना प्रकल्पातून पाणी सोडावे, अशी मागणी या ग्रामपंचायतींची आहे़ दरम्यान, दुधना काठावरील बहुतांशी ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी भरण्याची तयारी दर्शविली आहे़ त्यामुळे पाणीटंचाई व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघावा या हेतुने दुधनातून पाणी सोडावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे़ धरणातील पाणी दुधना नदीत सोडल्याने नागरिकांना दुहेरी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे़ पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तालुक्यातील काही गावांमध्ये निर्माण होणार आहे़ ही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पाणी सोडण्याची मागणी सदरील ग्रामपंचायतींच्या वतीने करण्यात आली आहे़ या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन, जनावरांसाठी पिण्याचे पाणी व चार्‍याचाही प्रश्न थोड्याफार प्रमाणात मार्गी लागणार असल्याचे दुधना नदीकाठावरील गावकर्‍यांचे म्हणणे आहे़ दुधना प्रकल्पात पाणीसाठा असतानाही दुधना काठावरील गावे तहानलेली आहेत़ जनावरांचा चार्‍याचा प्रश्नही बिकट आहे़ दुधना नदीत पाणी सोडले तर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न व विहिरींच्या पाण्याची पातळी वाढते़ अनेक महिने वाळू असल्यामुळे पाणीपातळी कायम राहते़ यामुळे पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे़ गारपिटीमुळे ज्वारीचा कडबा काळा पडला आहे़ परिणामी जनावरे कडबा खात नाहीत़ दुधनात पाणी सोडले तर शेतकरी जनावरांचा चारादेखील लावू शकतात़ यामुळे पाणी सोडण्याची मागणी आहे़