शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

खाते क्रमांकाअभावी मिळेना परीक्षा शुल्क माफीचा लाभ

By admin | Updated: July 16, 2014 01:23 IST

बीड : टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची २०१२- १३ मधील परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मात्र, खातेक्रमांक न कळविल्याने विद्यार्थी वंचितच राहिल्याची बाब पुढे आली आहे.

बीड : टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची २०१२- १३ मधील परीक्षा फी माफ करण्यात आलेली आहे. मात्र, मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला खातेक्रमांक न कळविल्याने विद्यार्थी वंचितच राहिल्याची बाब पुढे आली आहे.२०१२-१३ मध्ये जिल्ह्यात टंचाईस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर टंचाईग्रस्त गावांसाठी शासनाने विविध सवलती जाहीर केल्या होत्या. त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीच्या निर्णयाचाही समावेश होता. दहावीसाठी ३०० तर बारावीसाठी ३१५ रुपये इतके शुल्क आकारले होते. ते विद्यार्थ्यांना सरसकट परत केले जाणार होते. खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शासनाने शिक्षण विभागाला ५४ लाख १४ हजार ४०० रुपयांचा निधीही पाठविला; पण त्यापैकी २८ लाख ५३ हजार ९०० रुपयांचे वाटप होऊ शकले आहे. उर्वरित निधी तसाच पडून आहे. जिल्ह्यातील १६२ शाळांमधील मुख्याध्यापनकांनी खाते क्रमांक कळविले आहेत. अद्याप १८८ शाळांनी केवळ खाते क्रमांक न दिल्याने विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा फीच्या माफीचा लाभ पोहोचू शकला नाही. (प्रतिनिधी)मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणीटंचाईकाळातील मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसेल तरी ही लांच्छनास्पद बाब आहे. ज्या मुख्याध्यापकांनी खाते क्रमांक कळविले नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. खाते क्रमांक द्यायचे नसतील तर त्यांच्याकडून परीक्षा फी माफीचे शुल्क वसूल करावी, अशी मागणी मनविसेचे जिल्हाप्रमुख शैलेश जाधव यांनी केली. शुल्क परत करा अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.