शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ निवृत्तावर पुन्हा मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:54 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा विभागात नियुक्त्या : आस्थापना विभागाच्या आदेशाचा प्रशासनाला विसर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यास पुन्हा एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, असा निर्णय २३ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. या निर्णयाला १४ महिने उलटण्याच्या आतच केराची टोपली दाखवली आहे. तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांना परीक्षा विभागात एकत्रित वेतनावर नियुक्ती देत, त्यांची नेमणूक नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या विभागात केली आहे.
विद्यापीठ आस्थापनेवरील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पुनश्च विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर घेण्यात येऊ नये, जर संबंधित विभागप्रमुखांनी अशा प्रकारची नियुक्ती दिल्यास त्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही. संबंधित विभागप्रमुख जबाबदार राहील, अशा आशयाचे परिपत्रक तत्कालीन कुलसचिवांनी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी काढले होते. याविषयाचा धोरणात्मक निर्णय कुलगुरूंनी घेतला असल्याचेही संबंधित आदेशात म्हटले होते. मात्र, यास बरोबर १४ महिने संपण्याच्या आतच सेवानिवृत्त झालेल्या ३ कर्मचाºयांना दोन दिवसांपूर्वी परीक्षा विभागात नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात आर. पी. वाघ, एस. पी. दाभाडे आणि के. के. पैठणे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या नेमणुका वादग्रस्त ठरलेल्या अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम विभागात केल्या आहेत. मागील वर्षी १६ मेच्या मध्यरात्री साई अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तरपत्रिकाचे सील फोडून विद्यार्थ्यांना एका नगरसेवकाच्या घरी लिहिण्यास देण्याचा प्रकार उघडकीस आला होता. यात पोलिसांनी छापा मारत मोठे रॅकेट उघडकीस आणले. यामुळे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी १९ मे २०१७ रोजी परीक्षा संचालकांचा पदभार काढत अभियांत्रिकी विभागातील सर्वच कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यातून कोणीही सुटले नव्हते. यानंतर १ ते ३ जूनदरम्यान परीक्षा विभागासह इतर ठिकाणी ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या १२५ पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाºयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. यास सहा महिने होण्याच्या आतच परीक्षा विभागातून बदल्या झालेले अधिकारी, कर्मचारी पुन्हा मूळ ठिकाणी पोहोचले आहेत. अनेक वर्षांपासून परीक्षा विभागात काम करत असल्यामुळे त्यांची तेथील कामाची माहिती आहे. दुसºया कोणाची नियुक्ती केली, तर परीक्षा विभागाचे काम थांबेल, अशी भीती कुलगुरूंना दाखविण्यात येते. यामुळे एक-दोन अशा सतत बदल्या होत पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती निर्माण झालीे.
परीक्षा विभाग पूर्वपदावर
परीक्षा विभाग नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. ‘साई’ प्रकरणानंतर साफसफाई मोहीम राबविण्यात आली होती. नुकत्याच वसंतराव नाईक महाविद्यालयात एम.ए. व्यवस्थापनशास्त्र विषयाचा पेपर फुटल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकाºयांनी महाविद्यालय प्रशासनावर दबाव टाकल्याचे समोर आले होते. याचवेळी बदल्या झालेले सर्व कर्मचारी आणि आता सेवानिवृत्तही पुन्हा मूळ ठिकाणी आल्यामुळे सर्व काही पूर्वपदावर आले असल्याची चर्चाही दबक्या आवाजात विद्यापीठात सुरू आहे. नेमणूक केलेल्या तीन सेवानिवृत्त कर्मचाºयांमधील एकाला १० तर दोघाला १५ हजार रुपये एकत्रित वेतन देण्यात येणार आहे.