शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

४४६ शाळा संरक्षक भिंतीविना

By admin | Updated: May 8, 2014 23:30 IST

उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

 उस्मानाबाद : शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रत्येक शाळेने दहा निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या सुमारे ४६६ शाळांना आजही संरक्षक भिंती नसल्याने अशा शाळांचा परिसर मोकाट जनावंरासाठी कुरण बनला आहे. त्याचप्रमाणे २८३ शाळांमध्ये कीचन शेडच नसल्याने पोषण आहार उघड्यावर शिजविण्याची वेळ सर्व संबंधितांवर ओढावली आहे. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार प्रत्येक शाळेला पक्की इमारत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली, प्रत्येक शिक्षकासाठी एक वर्गखोली, अपंगाकरिता रॅम्पची सोय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह, पाणी, कीचनशेड, संरक्षक भिंत आणि क्रीडांगण या दहा भौतिक सुविधा असणे बंधनकारक आहे. गतवर्षी अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती. ही बाब शासनाने गांभिर्याने घेतल्यानंतर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांनी युद्ध पातळीवर ही कामे पूर्ण करुन घेतली होती. त्यामुळेच यावेळी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १ हजार १२९ शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण होवू शकली. असे असले तरी अन्य निकष मात्र शंभर टक्के शाळांनी पूर्ण केल्याचे दिसत नाही. मध्यंतरी बिहारसह काही राज्यात पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी जिल्ह््यातील शाळांच्या कीचनशेडचा प्रश्न ऐरणीवर आला होता. काही दिवस यावर चर्चा झाली. उपाययोजना करण्याचे ठरले. मात्र हा प्रश्न कालांतराने मागे पडला. त्यामुळेच की काय आजही जिल्ह्यातील २८३ शाळांमध्ये कीचनशेडची सुविधा नाही. तसेच एका शाळेला इमारत नाही. मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली बंधनकारक आहे. असे असले तरी २११ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे २१० शिक्षकांसाठी स्वतंत्र वर्ग खोली नाही. (प्रतिनिधी) वर्गामध्ये जाताना अपंगांना त्रास होऊ नये, म्हणून प्रत्येक शाळेला रॅम्प बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र आजही ४६ शाळांमध्ये रॅम्पची सुविधा नाही. ८ शाळांमध्ये मुलींसाठी तर ४ शाळांमध्ये मुलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह बांधलेले नाही. एका शाळेला क्रीडा मैदान नाही.