शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

३१ रस्ते, पुलांचे भाग्य उजळले

By admin | Updated: July 18, 2014 01:50 IST

जालना : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ‘एफडीआर’ योजनेअंतर्गत ३१ कामांसाठी ६ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे.

जालना : ग्रामीण भागात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरूस्तीसाठी शासनाने ‘एफडीआर’ योजनेअंतर्गत ३१ कामांसाठी ६ कोटी ६३ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला दिला आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात मागील दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने काही रस्ते व पूल खराब झाले होते. त्याचा परिणाम परिसरातील गावांच्या दळणवळणावर झाला होता. विशेष म्हणजे काही ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती. रस्ते व पुलांच्या नादुरूस्तीमुळे एस.टी.च्या बसगाड्याही गावापासून दूर अंतरावरच थांबत होत्या. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने याबाबत काही रस्ते व पुलांच्या दुरूस्तीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार ३१ कामांच्या दुरूस्तीसाठी निधी प्राप्त झाला आहे. या कामांमध्ये नळडोह ते पेवा, जोडरस्ता मंगरूळ, जोडरस्ता रानमळा, जोडरस्ता अंवलगाव, जोडरस्ता देवठाणा, जोडरस्ता देवठाणा, हेलसवाडी ते लिंबेवडगाव, लिंबेवडगाव ते झोपडपट्टी, केंधळी जोडरस्ता, जोडरस्ता मेसखेडा (ता. मंठा), जोडरस्ता कोरेगाव, जोडरस्ता रोहिना, लोणी ते गोळेगाव संकनपुरी ते चांगतपुरी, पळशी ते आनंदगाव, अकोली ते ब्राह्मणवाडी, कोकाटे हदगाव ते चंदूनाईक तांडा, पळशी ते फुलवाडी, श्रेष्टी ते वाहेगाव, नांद्रा ते आंबा (ता. परतूर), चिंचोली ते देऊळगाव तांडा, जोडरस्ता बामखेडा (ता. भोकरदन), बेलोरा धोंडखेडा ते चिंचखेडा, जोडरस्ता मंगरूळ (ता. जाफराबाद), जोडरस्ता मंगरूळ (ता. जाफराबाद), जोडरस्ता राममूर्ती (ता. जालना), जोडरस्ता अहंकार देऊळगाव (ता. जालना) यांचा समावेश आहे. सन २०१३-१४ मधील १३ व्या केंद्रीय वित्त आयोगाअंतर्गत पाच कामांसाठी १ कोटी ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला. यामध्ये लोणी ते गोळेगाव जोडरस्ता, लोणी ते पळशी (ता. परतूर), सुखापुरी ते घुंगर्डे हदगाव (ता. अंबड), फत्तेपुर (ता. भोकरदन) आणि वरूडी जोडरस्ता (ता. बदनापूर) या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी ठिकठिकाणच्या ग्रामस्थांनी जि.प. कडे मागणी केली होती. (प्रतिनिधी)याबाबत जि.प.चे उपाध्यक्ष राहुल लोणीकर म्हणाले की, दोन वर्षांच्या पाठपुराव्यानंतर शासनाकडून हा निधी प्राप्त झाला आहे. आणखी काही रस्ते व पुलांच्या दुरूस्तीकरीता शासनाकडे प्रस्ताव पाठविले असल्याचेही लोणीकर यांनी सांगितले.