शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के पाणी

By admin | Updated: May 29, 2014 00:21 IST

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली

परभणी : उन्हाळ्याच्या शेवटच्या चरणातही यावर्षी जिल्ह्यात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील १० ते १५ वर्षांच्या तुलनेत अशी परिस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यातील नागरिकांची पाणीटंचाईपासून मुक्तता झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपेक्षा पाणीटंचाईची तीव्रता अधिक वाटते. पाण्यासाठी होणारी भटकंती लक्षात घेता उन्हाळा सुरु होण्यापूर्वी पाण्याचे नियोजन केले जाते. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या वरचेवर वाढत जाते आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात चातकासारखी पावसाची वाट पाहिली जाते. त्यामुळे पाणीटंचाई पाचवीला पुजलेली असल्याची भावना जिल्हावासियांची झालेली आहे. परंतु, हे वर्ष याला अपवाद ठरले. जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवली नाही. काही गावांमध्ये पाण्याची समस्या असेलही. परंतु, ती पाणी नसल्याने नव्हे, तर नियोजनाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असताना केवळ नियोजनाच्या अभावामुळे काही भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली होती. गतवर्षी सरासरीच्या दीडपट पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे आणि सिंचन तलाव पाण्याने डबडबले होते. येलदरीसारखे मोठे धरणही १०० टक्के भरले होते. तसेच छोटे-मोठे तलाव, तळे, विहिरी, बंधारेदेखील पाण्याने भरलेले असल्यामुळे यावर्षी पाणीटंचाईने धूम ठोकली होती. जलस्त्रोतांमध्ये पाणी असल्यामुळे जिल्ह्याची पाणीपातळी देखील अल्पशी घटली. विहिरी आणि हातपंपाना अजूनही पाणी शिल्लक आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांना पाणीटंचाईपासून मुक्तता मिळाली. गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यातील करपरा आणि गंगाखेड तालुक्यातील मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांत मिळून ३७ टक्के पाणीसाठा आहे. करपरा प्रकल्पामध्ये ६.४० दलघमी पाणी आहे. तर मासोळी प्रकल्पात ४७ टक्के म्हणजे १२.७ दलघमी पाणी शिल्लक आहे. गतवर्षी या दोन्ही प्रकल्पात मिळून केवळ १२ टक्के पाणी शिल्लक होते. जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प आहेत. या लघूप्रकल्पामध्ये १९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तर मागील वर्षी याच दिवसांत केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. चार प्रकल्प जोत्याखाली मध्यम आणि लघूप्रकल्पांपैकी चार लघूप्रकल्पामधील पाणी जोत्याखाली आहे. तर १२ लघूप्रकल्पांमध्ये ० ते २५ टक्के, चार प्रकल्पामध्ये २६ ते ५० टक्के आणि २ प्रकल्पामध्ये ५१ ते ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.