शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यात परजिल्ह्यातून बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब झाले

हिंगोली : सेनगाव तालुक्यात परजिल्ह्यातून बदलीवर आलेले १५ शिक्षक गायब झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेत वजन वापरून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खुद्द सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे यांनी तक्रार केली आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गेल्या दोन वर्षापासून परजिल्ह्यातून येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी तर जिल्ह्यातून परजिल्ह्यात जाणाऱ्या शिक्षकांची संख्या अधिक असल्याचा प्रकार घडत आहे. यामध्ये मोठे अर्थकारण होत असून या बाबीकडे जिल्हा परिषदेतील अधिकारी कानाडोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेले शिक्षक ज्या गावाच्या नावाने पदस्थापना मिळवितात, त्या गावी रुजू न होता, जिल्हा परिषदेत आर्थिक वजन दाखवून सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवितात, अशी आतापर्यंत चर्चा होती. आता या चर्चेला दुजोरा मिळाला आहे. सेनगाव तालुक्यात पर जिल्ह्यातून १५ शिक्षक जून २०१३ ते जून २०१४ या कालावधीत बदलीवर आले. त्यामध्ये चांदू गणपती लोंढे (नियुक्ती जि.प.शाळा कापडसिंगी), दीपक कदम (ब्रम्हवाडी), संतोष अंभोरे (उटी), गजानन भिसे (बन), कृष्णा गाढवे (बन), नागनाथराव काळे (डोंगरगाव), सतीश पुरी (धोत्रा), जाधव (खैरी), सुरेश बेंडे (जामदया), महेश वाघमारे (बरडा), शंकर शिंदे (बोडखा), राजेश काळबांडे (तांदुळवाडी), दशरथ कदम (मकोडी), अनिता जाधव (कडोळी), साहेबराव खोडक (गणेशपूर) या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या; परंतु हे सर्व शिक्षक नियुक्त करण्यात आलेल्या शाळेवर रुजू न होता, त्यांनी एकवेळा सेनगाव येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर जिल्हा परिषदेतून सेनगाव तालुक्याऐवजी अन्य सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळविली. परिणामी या शिक्षकांच्या जागा तशाच रिक्त आहेत. परिणामी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)सभापती, उपसभापतींची तक्रारया संदर्भात सेनगाव पं.स.च्या सभापती शेषीकलाबाई गोपाळराव पाटील, उपसभापती लक्ष्मीबाई गडदे, पं.स. सदस्या पुनम नागेश कोटकर यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गुरूवारी तक्रार केली. त्यामध्ये तालुक्यात नियुक्त करण्यात आलेले १५ शिक्षक मुळ गावी रुजू झाले नसून अन्य ठिकाणी रुजू झाले आहेत. त्यामुळे या भागातील शाळांना शिक्षकांअभावी कुलूप लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांची तात्काळ त्यांच्या मुळ पदस्थापनेवर नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.