शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाघ चवताळले; सात महिन्यांत घेतला २४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 11:09 IST

Nagpur News चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे.

ठळक मुद्देब्रह्मपुरी वनविभाग आघाडीवरपुन्हा मानव वन्यजीव संघर्षाची चिन्हे

 

राजेश भोजेकर

 लोकमत न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर : चंद्रपूरची वाघांचा जिल्हा अशी ओळख असली तरी येथे वाघांचे हल्लेही थांबता थांबत नाही. यावर्षी अवघ्या सात महिन्यांत वाघाने तब्बल २४ जणांना बळी घेतला आहे. या घटनांनी त्या त्या भागात वाघांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीला वेग आला आहे. वाघांचे हल्ले असेच सुरू राहिले तर मानव-वन्यजीव संघर्ष उफाळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असला तरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कुठे ना कुठे वाघांचे दर्शन होते. जिल्ह्यातील बहुतांश गावांचा जंगलाशी अगदी जवळचा संबंध आहे. काही गावांतील नागरिकांची उपजीविकाच जंगलावर आहे. तेंदुपत्ता हंगाम आला तर जंगलात जाणे आलेच. अशातही अनेकदा वाघांचे हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगतच्या गावातील नागरिकांनी सरपणासाठी जंगलात जाण्याची गरज भासू नये म्हणून शासनाने मोफत गॅस सिलिंडर दिले़,मात्र गॅस सिलिंडरच्या किमती गरिबांच्या आवाक्याच्या बाहेर असल्यामुळे खरेदी करू शकत नाही. शेवटी जंगलात जाणे आलेच. गावातील गुरे चारण्यासाठी काहीजण शिवारात जातात. अनेक गावांचा शिवारही जंगलाला लागून आहे. काही गावांना गुरे चारण्यासाठी जंगलाशिवाय पर्याय नाही. अशावेळी वाघांचे हल्ले होऊन गेल्या सात महिन्यांत तब्बल २४ जणांना वाघाच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत.

सर्वाधिक दहा हल्ले ब्रह्मपुरी वनविभागात झालेले आहेत. या पाठोपाठ सात हल्ले चंद्रपूर वनविभागातील आहेत. चंद्रपूर बफरमध्ये तीन, चांदा वनविभागात दोन, चंद्रपूर चांदा व वेस्ट चांदा वनविभागात प्रत्येक एक हल्ला वाघाने केला आहे. वाघांच्या या हल्ल्यामुळे त्या परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. शेतकऱ्यांना खरिपाचा हंगाम असतानाही शेतावर जाता येत नाही. चिमूर तालुक्यातील पळसगाव परिसरात आठवडाभर वाघीण दोन बछड्यांसह फिरत होती. आता ती परिसरातील पिपर्डा गावाकडे गेली आहे. दहशत मात्र संपलेली नाही. यावर उपाययोजना करण्यात वनविभाग कमी पडत असल्यामुळे मानव व वन्यजीव संघर्ष होत असल्याचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव नवीन नाही. यावर कायम तोडगा काढण्यात अद्यापही यश आल्याचे या घटनांवरून दिसत नाही.

 

टॅग्स :Tigerवाघ