शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अफगाणिस्तानात तणाव वाढला; इकडे ड्रायफ्रुट्स महागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST

सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ लागले. चंद्रपुरात अनेक ठिकाणी स्पेशल सुकामेव्याची दुकाने आहेत. तालुकास्थळी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये किराणा दुकानातच सुकामेवा विक्रीसाठी ठेवला जातो. सुकामेवा थोक विक्रीची राज्य आणि देशपातळीवर एक साखळी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायात काही अघटित घडल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपल्या सैनिक फौजा परत बोलावल्याने तेथील सरकार कोसळले आणि धर्ममार्तंड तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळविला. या देशातून भारतासह जगभरात सुकामेवा (ड्रायफ्रुट्स) पुरवठा केला जातो. तालिबान्यांमुळे तेथील परिस्थिती अराजक झाली. उद्योग-व्यापार क्षेत्रात अनिष्ट परिणाम होऊन सुकामेवा पुरवठ्याची साखळी तुटली. चंद्रपुरातही ड्रायफ्रुट्सच्या विक्रीत वाढ होत आहे, अशी माहिती व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला      दिली.सुकामेवा हे श्रीमंती खाणे समजले जाते. मात्र, कोरोनामुळे मध्यमवर्गीय व सामान्य कुटुंबेही पोषक तत्त्वे व आरोग्यासाठी सुकामेवा विकत घेऊ लागले. चंद्रपुरात अनेक ठिकाणी स्पेशल सुकामेव्याची दुकाने आहेत. तालुकास्थळी व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये किराणा दुकानातच सुकामेवा विक्रीसाठी ठेवला जातो. सुकामेवा थोक विक्रीची राज्य आणि देशपातळीवर एक साखळी आहे. आंतरराष्ट्रीय उद्योग व्यवसायात काही अघटित घडल्यास त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होतो. अफगाणिस्तानच्या पायाभूत विकासकामांसाठी भारताने मोठी गुंतवणूक केली. या देशाचा भारताशी व्यावसायिक संबंध आहे. विशेषत: सुकामेवा पुरवठा करण्यात अफगाणिस्तान आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्याने तेथील उद्योग स्थिती बदलली. त्याचे अनिष्ट परिणाम आता राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. सुकामेव्याच्या किमती वाढणे त्याचाच भाग असल्याचे चंद्रपुरातील व्यावसायिक गोविंद लालवानी व राजुरा, बल्लारपूर येथील विक्रेत्यांनी  ‘लोकमत’ला सांगितले.

नवीन ऑर्डर घेणे बंद - अक्रोड, काजू, खारीक, पिस्ता, बदाम, अंजिर, जर्दाळू व किसमिस खरेदीची नवीन ऑर्डर घेणे नागपुरातील मोठ्या व्यापाऱ्यांनी बंद केले. चंद्रपुरातील आठ-दहा व्यापाऱ्यांकडे आठवडाभर पुरेल इतकाचा सुकामेवा उपलब्ध आहे. हा स्टॉक संपल्यानंतर पुन्हा उपलब्ध होईल, याची खात्री नाही. बदामचे दर तर याच आठवड्यात प्रति किलो ३०० रुपयांनी वाढले. यापूर्वी ७०० रुपये किलो असा दर होता.

...तर दर पुन्हा भडकण्याची शक्यता सुकामेवा विकत घेणाऱ्यांची संख्या कोरोनापासून वाढली. तेव्हा दर कमी होते. काही ड्रायफ्रुट्सचा औषधीसारखा उपयोग केला जातो. स्थिर असलेल्या दरात दोन आठवड्यात अचानक वाढ झाली. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील व्यापार स्थिती बदलली नाही तर दर पुन्हा भडकू शकतात. स्थिती बदलणार काय, हे सांगता येत नाही.   - देवांश पंजवानी, व्यावसायिक, चंद्रपूर

ग्रामीण भागातील लहान दुकानदार चंद्रपुरातून सुकामेवा विकत घेतात. पण, आता दर वाढल्याने त्यांना गुंतवणूक अधिक करावी लागते. यासाठी हे दुकानदार रिस्क घेऊ इच्छित नाहीत. किमती वाढल्याने ग्राहक सुकामेव्याऐवजी दुसऱ्या वस्तूंना विकत घेतील, अशी स्थिती निर्माण झाली. - परमानंद कावडकर, किराणा व्यावसायिक, चंद्रपूर 

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तान