शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 5:00 AM

कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात.

ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा । दुबार पेरणीचे संकट, रात्रीचा पाऊस दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : मृगाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामातील कपाशीची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका आहे. यंदाही अस्मानी संकटांनी शेतकरी भरडण्याची चिन्हे आहेत. शनिवारी रात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात. पुन्हा पाच दिवसात पाऊस आला नाही तर उसनवारी व कर्ज काढून पेरलेले महागडे बियाणे पुन्हा घ्यायला शेतकºयांकडे पैसा उरला नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, कढोली, मानोली, बाबापूर चार्ली, निर्ली, धिडशी, माथरा, गोयेगाव, अंतरगाव परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली. सध्या कपाशीचे बीज अंकुरण्याचा काळ असतानाच पाऊस गायब झाला. रात्रीला जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.कपाशी जमिनीतच करपण्याची भीतीकपाशी वाचविण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे काही खरे नाही. असा केविलवाणा सुर शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे ‘काळ्या आईच्या कुशीत पेरलेले बीज उमलू दे’ एवढीच इच्छा शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती