शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

एक ‘तपा’पासून शेतकरी जमिनीच्या मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: November 15, 2015 00:36 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते.

ठिय्या आंदोलन : मोबदल्याच्या प्रतीक्षेतच तीन शेतकऱ्यांचा मृत्यूखडसंगी: शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था व्हावी म्हणून शासनाकडून तलावाची निर्मिती करण्यात येते. चिमूर तालुक्यातील लघु सिंचाई विभागांतर्गत सन २००२ मध्ये डोंगर्ला येथील शेतकऱ्याची जमीन तलावासाठी व नहरासाठी जमीन शासनाने संपादित केली. मात्र शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीचा मोबदला अजूनही दिला नसल्याने डोंगर्ला येथील शेतकऱ्यांना एका ‘तपा’पासून मोबदल्याची प्रतीक्षा आहे.चिमूर तालुक्यात आजही ५२ हजार ७०० हेक्टर शेती कोरडवाहू आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी निसर्गावर अवलंबून असतात. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पाहिजे त्या प्रमाणात शेतीला पाणी मिळत नसल्याने शेतकरी उत्पन्नापासून वंचित आहेत. परिणामी त्यांना आर्थिक विवंचनेत जीवन जगावे लागत आहे. या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली संसाराचा गाडा चालवावा लागत आहे. या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा याकरिता शासन काही प्रमाणात सिंचनाच्या व्यवस्था करीत आहे.चिमूर तालुक्यातील कोरडवाहू शेती सिंचनाखाली यावी, यासाठी लघु सिंचाई विभागामार्फत तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावासाठी डोंगर्ला येथील अकरा शेतकऱ्यांची जमीन भूसंपादन करण्यात आली. त्यामध्ये केशव सिजु चौधरी व इतर यांची १.२२ हेक्टर आर, रामकृष्ण चौधरी (मय्यत) यांची ०.४९ हे.आर, माणिक लक्ष्मण चौधरी यांची १.६५ हे.आर, दिवाकर शिवराम जांभुळे १.२२ हे.आर., बाळकृष्ण शिवराम जांभुळे व इतर यांची ०.३५ हे.आर., योगराज जांभुळे व इतर यांची ०.१५ हे.आर., धनराज बाजीराव चौधरी यांची २.६५ हे.आर., मेघराज गोपाळा चौधरी ०.८५ हे.आर., बाजीराव नामा चौधरी (मय्यत) व इतर यांची ०.२५ हे.आर. व नथ्थु कवडू चौधरी यांची ०.४९ हे.आर. जमिनी संपादित केली. मात्र १२ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने या आदिवासी शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. त्यामुळे हे शेतकरी अनेक वर्षांपासून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजावीत आहेत. मात्र शासनाच्या दप्तर दिरंगाईने या शेतकऱ्यांना आज नाही उद्या मोबदला देतो, अशा आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.काही शेतकरी कार्यालयाच्या चकरा मारता मारता मृत झालेत. मात्र अजुनही त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांना मोबदला मिळावा, याकरिता स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण जांभुळे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयात ९ नोव्हेंबरला ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. या आंदोलनात अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)