शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते व नाल्यांचा बॅकलाग

By admin | Updated: January 29, 2015 23:04 IST

चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात येऊन आता जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी होत आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे, असेही म्हणता येणार नाही.

रवी जवळे - चंद्रपूरचंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात येऊन आता जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी होत आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे, असेही म्हणता येणार नाही. असे असतानाही या महानगरातील अनेक वसाहती विकासापासून वंचित आहेत. लोकमतच्या ‘लोकमत जागर’ या अभियानात याचा प्रत्यय येत आहे. लोकमत चमूने आज अष्टभुजा प्रभागात फेरफटका मारला असता हा प्रभागही अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे दिसून आले. या प्रभागात रस्त्यांची समस्या कायम आहे. प्रभागात काही मोजक्या ठिकाणीच रस्त्यांची कामे झाली आहे. नाल्याही तुटलेल्या असून काही ठिकाणी नाल्याच नाही. महाकाली कॉलरी परिसरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे.महानगरपालिका हद्दीतील महात्मा गांधी मार्ग, कस्तुरबा मार्ग, नागपूर मार्ग या मार्गाला लागून असलेल्या परिसरात विकास झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या मार्गावरून बरीच बाहेरगावची मंडळी जाणेयेणे करतात. त्यांना प्रथमदर्शनी महानगराचा चांगलाच विकास झाल्याचे दिसून येत असावे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. शहरातील अंतर्गत व टोकावरील वसाहतीचा अद्यापही पाहिजे तसा विकास झालेला नाही. रस्ते, नाल्या, पिण्याची पाणी, पथदिवे यासारख्या मुलभूत सोईची अद्याप नागरिकांना मिळालेल्या नाही. लोकमत चमूने आज गुरुवारी अष्टभुजा प्रभागात फेरफटका मारला असता नागरिकांनी रस्ते व नाल्यांच्याच समस्या आवर्जुन सांगितल्या. अष्टभुजा प्रभाग हा बायबास मार्गावर शहराच्या शेवटच्या टोकावर वसला आहे. राजेश रेवल्लीवार व सुभेदिया कश्यप हे या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. या प्रभागातील अष्टभुजा वार्डातील अष्टभुजा मंदिराच्या बाजुच्या परिसरातील रस्ते अतिशय निमुळते आहे. चारचाकी वाहन या रस्त्यांवरून जाऊ शकत नाही. काही रस्त्यांचे कामे सुरू आहेत. काही नाल्यांचीही कामे सुरू आहेत. मात्र गल्लोगल्लीतील काही रस्ते अद्याप उखडलेलेच आहे. काही नाल्या जुन्याच असलेल्या दिसतात. संत रविदास चौकात सिमेंट रस्त्यांची कामे झालेली दिसली. मात्र या परिसरात कचराकुंड्याच नाही. त्यामुळे कचरा रस्त्याच्या कडेलाच फेकला जातो. काही वेळा घराघरातील कचरा नालीत फेकला जातो. नाल्याही नियमित साफ केल्या जात नाही. अष्टभुजा माता मंदिराच्या बाजुच्या परिसरात पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन अतिशय लहान आहे. त्यामुळे नळाला मुबलक पाणी येत नाही. उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या तीव्र होते. विशेष म्हणजे, या परिसरात सार्वजनिक नळ एकही नाही. हातपंप एक आहे, तोदेखील बंदच राहतो. त्यामुळे पाण्यासाठी उन्हाळ्यात नागरिकांना भटकंती करावी लागते. उल्लेखनीय असे की दीड महिन्यांपूर्वी नवीन पाईप लाईन टाकण्यासाठी या परिसरात महानगरपालिकेने सर्वे केल्याचे नागरिक सांगतात. मात्र अद्यापही पाईप लाईन टाकण्याची प्रक्रिया पुढे सरकली नाही. या परिसरात आणखी एक समस्या गंभीर आहे. अष्टभुजा मंदिराच्या बाजुने एक मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याला पूर येऊन नागरिकांच्या घरातही पाणी शिरत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. यापूर्वी अनेकांच्या घरात पाणी शिरून नागरिकांचे नुकसान झाले आहे. या वर्षीचा पावसाळा याला अपवाद ठरला. अष्टभुजा नगर मोठा वसाहत परिसर असूनही या ठिकाणी मोकळ्या जागा नाहीत. लहान मुलांना खेळासाठी एकही पटांगण नाही. तशी जागाच या परिसरात महानगरपालिकेने आरक्षित ठेवलेली दिसत नाही. सर्वत्र घरांचीच गर्दी झालेली दिसून येते. पुढे पटांगणाची मागणी नागरिकांकडून पुढे येऊ शकते. अष्टभुजा प्रभागातील महाकाली कॉलरी परिसरातही रस्त्यांचा बॅकलाग दिसून येते. या पसिरातील रस्तेही उखडले आहे. येथील मुख्य रस्त्यांवरच डांबरीकरण करण्याची गरज आहे. अंतर्गत लहान रस्त्यांची तर दैनावस्था झाली आहे. महाकाली कॉलरी परिसरातील मुख्य रस्त्यावरील नाल्या जुन्या आहेत. ठिकठिकाणी या नाल्यांची काठं तुटलेली आहेत. महाकाली कॉलरी परिसरातील आतील वसाहती अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकामच करण्यात आलेले नाही. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असते. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. महाकाली कॉलरी परिसरात पाण्याचा प्रश्नही बिकट आहे. या परिसरात अनेकांच्या घरात नळ नाही. विशेष म्हणजे परिसरात हातपंपांची व्यवस्था नाही. वेकोलिच्या बंकरचे पाणी सोडले जाते. याच पाण्याच्या भरोशावर येथील नागरिक आपली दैनंदिन कामे करतात. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिक सांगतात. विशेष म्हणजे, या परिसरातूनही एक मोठा नाला वाहतो. पावसाळ्यात या नाल्याचे पाणी रस्त्यावर येते.