शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बांधावरुनच सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 06:00 IST

दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला.

ठळक मुद्देमदतीची आस : नुकसानीचा वस्तुनिष्ठ माहितीवर शेतकऱ्यांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. मात्र महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेताच्या बांधावरुन नजर सर्वेक्षण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकसानीच्या वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाबद्दल शेतकऱ्यांमध्येच संशय व्यक्त होत आहे. सर्वेक्षणच योग्य झाले नाही तर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला. त्या अहवालात जिल्ह्यात केवळ ८ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. खरे पाहता एकाच तालुक्यात यापेक्षा दुप्पट नुकसान झाले आहे. मात्र याबाबत प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहे. या अर्जाची सहानिशा केल्यास खरा आकडा कळू शकतो.
आता शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी गावागावांत जावून सर्वेक्षण करीत असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही सर्वेक्षणासाठी पथक पोहोचले नसल्याची ओरड होत आहे. काही गावात केवळ एका ठिकाणी बसून सर्वेक्षण केले जात आहे. तर काही गावात शेतकऱ्यांच्या बाध्यापर्यंत पोहोचून केवळ नजरेने पाहणी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करतांना संबंधित गावातील सरपंच आणि पोलीस पाटलांसोबत शेतकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. केवळ शासकीय सोपस्कार पार पाडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कडप्याला येतोय सडका वास
परतीच्या पावसाने काढणी झालेला धान ओला झाला. हा कडपा आता सडत असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक शेतकºयांनी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. मात्र पावसाने मातीमोल झालेल कडपातून कोणत्याही उत्पनाची आशा नाही. झोपलेल्या धानाला अंकुर फुटत असून अनेक ठिकाणी धान काळा पडला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती