शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

बांधावरुनच सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2019 6:00 AM

दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला.

ठळक मुद्देमदतीची आस : नुकसानीचा वस्तुनिष्ठ माहितीवर शेतकऱ्यांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धानपिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. मात्र महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी शेताच्या बांधावरुन नजर सर्वेक्षण करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नुकसानीच्या वस्तुनिष्ठ सर्वेक्षणाबद्दल शेतकऱ्यांमध्येच संशय व्यक्त होत आहे. सर्वेक्षणच योग्य झाले नाही तर मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.दिवाळीच्या पर्वात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाताशी आलेले धानपिक उद्ध्वस्त केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी, लाखांदूर, साकोली या तालुक्यात संपुर्ण धानपीक उद्ध्वस्त झाले आहे. यासोबतच इतर तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने ३० ऑक्टोबर रोजी शासनाला नुकसानीचा अहवाल पाठविला. त्या अहवालात जिल्ह्यात केवळ ८ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे. खरे पाहता एकाच तालुक्यात यापेक्षा दुप्पट नुकसान झाले आहे. मात्र याबाबत प्रशासन काहीही बोलायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहे. या अर्जाची सहानिशा केल्यास खरा आकडा कळू शकतो.आता शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी व महसूल विभागाचे अधिकारी गावागावांत जावून सर्वेक्षण करीत असल्याचे चित्र आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही सर्वेक्षणासाठी पथक पोहोचले नसल्याची ओरड होत आहे. काही गावात केवळ एका ठिकाणी बसून सर्वेक्षण केले जात आहे. तर काही गावात शेतकऱ्यांच्या बाध्यापर्यंत पोहोचून केवळ नजरेने पाहणी केली जात आहे. यामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण करतांना संबंधित गावातील सरपंच आणि पोलीस पाटलांसोबत शेतकऱ्यांच्या समक्ष सर्वेक्षण करण्याची गरज आहे. परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही. केवळ शासकीय सोपस्कार पार पाडण्याकडे सर्वांचे लक्ष आहे.कडप्याला येतोय सडका वासपरतीच्या पावसाने काढणी झालेला धान ओला झाला. हा कडपा आता सडत असून त्याला दुर्गंधी सुटली आहे. अनेक शेतकºयांनी ओला झालेला कडपा वाळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. मात्र पावसाने मातीमोल झालेल कडपातून कोणत्याही उत्पनाची आशा नाही. झोपलेल्या धानाला अंकुर फुटत असून अनेक ठिकाणी धान काळा पडला आहे. यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती