शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:01 IST

विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी ...

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त-बियाणे कंपनी बिनधास्त : चौकशी समितीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष




विशाल रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी केली. धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून सुध्दा तब्बल चार तास उशिरा चौकशी स्थळावर उपस्थित झाले. यावेळी शेतकºयांनी समितीला एकच उत्तर दिले, ‘साहेब तुम्हीच ही शेती करा नाहीतर मोबदला तरी द्या’.
आता पेरणी केलेल्या धान्य बियाणे परिपूर्ण उगवले नसल्याने शेतात परिपूर्ण रोवणी होऊ शकत नाही. आता वेळेवर भात रोप आणायचे कुठून? आता क्षेत्रीय समितीच्या अहवालाकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राहुल खोब्रागडे व आनंदराव करंजेकर या शेतकºयांनी धान बिजायतमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल करताच तालुकास्तरीय चौकशी समिती शेतकºयांच्या शेतात दाखल झाली होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे, कृषी अधिकारी संजय लांजेवार, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर, यशोदा व आरके सिड्स कंपनी तथा कृषी केंद्र चालक यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारकर्ते शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतीची यावेळी बारीक सारीक पाहणी करण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल अद्याप शेतकºयांच्या हातात मिळालेला नाही. अहवाल लवकरच शेतकºयांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जी. आर. शामकुवर, तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे यांनी सांगितले. माहितीनुसार ज्या कृषी केंद्रातून धान्य बियाणे घेतल्यानंतर या दोन शेतकºयांची फसगत झाली. अशीच फसगत अड्याळ गावातील अजून काही शेतकºयांची सुद्धा झाली होती. यात दोन शेतकºयांनी तक्रार दाखल केली तसेच शेतातील स्थिती वारंवार सांगून सुद्धा धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले नाही. कुठलीही माहिती या शेतकºयांना मिळाली नसल्याने पुन्हा अतिरिक्त बियाणे घातल्याची माहिती आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर बसतोच पण आता निसर्गसोबतच बोगस बियाण्यांचाही शेतकºयांना फटका बसत आहे.

सरतेशेवटी शेतकºयांचीच परीक्षा
शेतकºयांना वारंवार कृषी विभाग पेरणी संदर्भात मार्गदर्शन करतो की पेरणी घरातील धान्य बियाणांचा वापर करूनच करा पण दरवर्षी पेरणी चा हंगाम लागताच शेतकºयांची गर्दी बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रात पाहायला मिळते. काही दिवसातच कुठे बियाणे उगवले नाही तर कुठे बियाणे पुर्णत: उगवले नसल्याची तक्रार शेवटी कृषी कार्यालयात दाखल होऊन पंचनामासाठी चौकशी समिती अहवाल शेतकºयांना सादर करते, यामध्ये मात्र अंतत: शेतकरीच भरडला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :agricultureशेती