शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

साहेब, तुम्हीच शेती करा, नाही तर मोबदला द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 5:00 AM

विशाल रणदिवे । लोकमत न्यूज नेटवर्क अड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी ...

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त-बियाणे कंपनी बिनधास्त : चौकशी समितीच्या अहवालाकडे शेतकऱ्यांचे लक्ष

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : येथील शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक झाली. तक्रारीनंतर क्षेत्रीय चौकशी समितीने पाहणी केली. धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रव्यवहार करून सुध्दा तब्बल चार तास उशिरा चौकशी स्थळावर उपस्थित झाले. यावेळी शेतकºयांनी समितीला एकच उत्तर दिले, ‘साहेब तुम्हीच ही शेती करा नाहीतर मोबदला तरी द्या’.आता पेरणी केलेल्या धान्य बियाणे परिपूर्ण उगवले नसल्याने शेतात परिपूर्ण रोवणी होऊ शकत नाही. आता वेळेवर भात रोप आणायचे कुठून? आता क्षेत्रीय समितीच्या अहवालाकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राहुल खोब्रागडे व आनंदराव करंजेकर या शेतकºयांनी धान बिजायतमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाखल करताच तालुकास्तरीय चौकशी समिती शेतकºयांच्या शेतात दाखल झाली होती. यामध्ये तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे, कृषी अधिकारी संजय लांजेवार, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर, यशोदा व आरके सिड्स कंपनी तथा कृषी केंद्र चालक यांचे प्रतिनिधी तसेच तक्रारकर्ते शेतकरी यावेळी उपस्थित होते. शेतीची यावेळी बारीक सारीक पाहणी करण्यात आली. चौकशी समितीचा अहवाल अद्याप शेतकºयांच्या हातात मिळालेला नाही. अहवाल लवकरच शेतकºयांना देण्यात येणार असल्याचे डॉ. जी. आर. शामकुवर, तालुका कृषी अधिकारी ए. बी. घोगरे यांनी सांगितले. माहितीनुसार ज्या कृषी केंद्रातून धान्य बियाणे घेतल्यानंतर या दोन शेतकºयांची फसगत झाली. अशीच फसगत अड्याळ गावातील अजून काही शेतकºयांची सुद्धा झाली होती. यात दोन शेतकºयांनी तक्रार दाखल केली तसेच शेतातील स्थिती वारंवार सांगून सुद्धा धान्य बियाणे कंपनीचे प्रतिनिधी शेतात आले नाही. कुठलीही माहिती या शेतकºयांना मिळाली नसल्याने पुन्हा अतिरिक्त बियाणे घातल्याची माहिती आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका तर बसतोच पण आता निसर्गसोबतच बोगस बियाण्यांचाही शेतकºयांना फटका बसत आहे.सरतेशेवटी शेतकºयांचीच परीक्षाशेतकºयांना वारंवार कृषी विभाग पेरणी संदर्भात मार्गदर्शन करतो की पेरणी घरातील धान्य बियाणांचा वापर करूनच करा पण दरवर्षी पेरणी चा हंगाम लागताच शेतकºयांची गर्दी बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रात पाहायला मिळते. काही दिवसातच कुठे बियाणे उगवले नाही तर कुठे बियाणे पुर्णत: उगवले नसल्याची तक्रार शेवटी कृषी कार्यालयात दाखल होऊन पंचनामासाठी चौकशी समिती अहवाल शेतकºयांना सादर करते, यामध्ये मात्र अंतत: शेतकरीच भरडला जातो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

टॅग्स :agricultureशेती