शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे.

ठळक मुद्देभाकप व किसान सभेचे आयाेजन : तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : किसान कामगार विरोधी मोदी सरकारने तीन काळे शेतकी  कायदे मंजूर करण्यासाठी अध्यादेश जारी केला होता, त्याला शनिवार रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ, तसेच तीन काळे शेतकी कायदे रद्द करण्याच्या व इतर मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार भंडारा येथे  देशव्यापी चेतावणी दिन  पाळण्यात आला.आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सदानंद इलमे व किसान सभेचे  सचिव माधवराव बांते यांनी केले.शेतकऱ्यांच्या देशव्यापी चेतावणी दिनानिमित्त भाकप व किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच शनिवारी कार्यालयांना सुटी असल्याने भंडारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप केंद्रे  यांना निवेदन देण्यात आले. त्यात देशव्यापी मागण्या - वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, सर्व पिकांसाठी किमान हमीभावाचा  कायदा करा,  सर्व बेरोजगारांना लाॅकडाऊनच्या काळासाठी मोफत धान्य व साडेसात हजार रुपये देण्यात यावे. खमारी बुट्टी (ता. भंडारा) येथील पूर पीडित गावकऱ्यांच्या घरात पाणी घुसल्याने अनेकांची घरे पडली, त्यांना ९५ हजारांचे आर्थिक सहाय्य, अतिक्रमित घरकूलधारकांची घरे नियमानुकूल करून मालकी पट्टे देण्यात यावे. गणेश चिचामे यांना महसूल विभागाच्या चुकीमुळे वन हक्क कायद्याच्या अंतर्गत पट्ट्यापासून वंचित करण्यात आले. त्यांना मालकी पट्टे देण्यात यावे. नंदकिशोर रामटेके व इतर प्रलंबित  जबरान जोतदारांना मालकी पट्टे  देण्यात यावे. महादेव आंबाघरे सुरेवाडा पुनर्वसन यांना  मंजूर भूखंड देण्यात यावे. तसेच ग्रामसेवक कॉलनी भंडारा येथील उर्वरित २७ प्रकल्पग्रस्तांना मोबदला व भूखंड देऊन पुनर्वसन करण्यात यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. 

ठाणेदारांना निवेदनविविध मागण्या मंजूर करण्यात याव्यात यासाठी ठाणेदारांना निवेदन करण्यात आले. शिष्टमंडळात हिवराज उके, माधवराव बांते सदानंद इलमे, महानंदा गजभिये, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, रत्नाकर मारवाडेे, गणेश चिचामे, विलास केजकर, महादेव ताराचंद आंबाघरे, हरिदास जांगडे, गिरधारी मेश्राम, सुनील बोरकर आदींचा समावेश होता.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन