शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

१७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 5:00 AM

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते.

ठळक मुद्देविक्री बंदचे दिले आदेश : तक्रारीवरून कृषी विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात बळीराजाला जादा दराने खतांची विक्री करणाऱ्या तसेच तपासणी दरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींच्या आधारे जिल्ह्यातील १७ कृषी केंद्रावर कृषी विभागाने निलंबनाची कारवाई केली. या कारवाईत रासायनिक खताचे १० परवाने , बियाण्याचे चार परवाने, कीटकनाशकांचे तीन परवाने निलंबित करण्यात आले आहेत.शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून चार जुलै ते सात जुलै दरम्यान जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकांद्वारे कारवाईची मोहीम राबवली. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, मिलींद लाड यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करुन योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र तरीदेखील अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर दर्शनी भागात कृषी निविष्ठांचा दर फलक लावलेला दिसून आला नाही , नोंदणी प्रमाणपत्र ठळकपणे दिसेल असे न लावले नाही, तसेच पीओएस मशीनद्वारे खताची विक्री न करणे, रासायनिक खताची विक्री करताना शेतकऱ्यांना एमफॉर्मध्ये बिले न देता, विक्री केलेल्या रासायनिक खतांची बिले न ठेवणे, साठा रजिस्टर व गोडाऊनमधील प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा व पोस्ट मशीन मधील साठा जुळून आला नाही. बिल बुकावर कंपनीचे नाव व लॉट नंबर लिहिले जात नसल्याच्या कारणांवरुन ही कारवाई करण्यात आली.कारवाईत पवनी तालुक्यातील आठ कृषी केंद्रांवर, लाखनी तालुक्यातील दोन कृषी केंद्रावर, साकोली तालुक्यातील दोन, भंडारात एक, तर लाखांदूरात एक कारवाई करण्यात आली. कारवाईत रासायनिक खतांच्या बियाण्याचे कीटकनाशकाचे १७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत कारवाई केली.कारवाईदरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, मोहिम अधिकारी विकास चौधरी, गुणनियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले, आदित्य घोगरे, पद्माकर गिदमारे, सागर ढवळे, बालाजी शन्नेवाड, संजय लांजेवार सहभागी झाले होते. कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाची कारवाई सुरूच असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग दक्ष असून शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावी. अधिक किमतीने खतांची कुणी विक्री करीत असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीच्या कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा.- हिंदुराव चव्हाण,जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा.

टॅग्स :agricultureशेती