शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

कला, आरोग्य विषयाचे शिक्षकांची उणीव

By admin | Updated: August 17, 2014 23:00 IST

विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. इथे तर ना गुण ना दर्जा निर्माण करणारे गुरुजी नाहीत.

मोहाडी : विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. इथे तर ना गुण ना दर्जा निर्माण करणारे गुरुजी नाहीत.गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र्र शासनाने ६ ते १४ वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ची अंमलबजावणी करण्यात आली. यात मुलांची शैक्षणिक प्रगती उंचावत नेणे ही प्राथमिकता आहे. तथापि विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विषय शिक्षकांची अतिशय कमतरता भासत असल्याने विद्यार्थ्यांच्या दर्जेदार व गुणात्मक शिक्षणाची आशा कशी करायची असा प्रश्न उभा होतो.प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तरात शासनाने सुधारणा केली आहे. त्यानुसार इयत्ता १ ली ते ८ वी प्राथमिक शिक्षण, इयत्ता १ ली ते ५ वी कनिष्ठ प्राथमिक इयत्ता ६ वी ते ८ वी वरिष्ठ प्राथमिक संबोधण्यात येणार आहे. ६ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये विज्ञान व गणित, सामाजिक अभ्यास व भाषा या प्रत्येक विषयासाठी किमान एक शिक्षक असले पाहिजेत असे निकष व मानके ठरविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना कमी वयात शारीरिक सुदृढतेचे महत्व कळावे क्रीडा कौशल्य निर्माण व्हावे शिवाय कला क्षेत्रात कल्पनांचे मनोरे बांधावे, कार्यशिक्षण घ्यावे हा विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे. पण आज स्थितीत विज्ञानाची दृष्टी देणारा विज्ञान व गणित शिक्षकांची मोहाडी तालुक्यात उणीव भासली आहे. आज तालुक्यात १४ बी.एससी.गणित, विज्ञान शिक्षकांची आवश्यकता असताना केवळ तीनच बी.एससी शिक्षक कार्यरत आहेत. मोहाडी तालुक्यात ६ ते ८ वीच्या ४० शाळा आहेत. सध्या ७ वी ला ८ जोडणाऱ्या १३ शाळा सुरू झालेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या ३४ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. १ ते ५ वीचे सेमी इंग्रजीचे ८ वर्ग आहेत. म्हणजे सेमी इंग्रजीमध्ये गणित व विज्ञान या दोन विषयाचा समावेश होतो. या दोन विषयांना शिकवण्यासाठी बी.एस.सी अर्हताधारक शिक्षकांची आवश्यकता आहे. आज स्थितीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ६ ते ८ व्या वर्गांना विज्ञान व गणित विषय शिकविणारे शिक्षक केवळ १५ टक्के असल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच १ ते ५ मध्ये सेमी इंग्रजी शिक्षणाचा दर्जा वाढविण्याची अपेक्षा करणाऱ्या शिक्षकांची कमी आहे. १ ते ८ वी पर्यंतच्या बालकांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया खचत चालला असल्याचे स्पष्ट दिसून येतो. ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकासाचा कार्यक्रम असला तरी दर्जेदार शिक्षण देणारा शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करण्याचे उपाय आपोआपच जागीच थांबत चालले आहेत. तसेच कलाशिक्षण, आरोग्य व शारिरीक शिक्षण व कार्यशिक्षण (कार्यानुभव) हे विषय शिकविण्यासाठी राज्यात एकही अंशकालीन निदेशक नियुक्त केले गेले नाहीत. प्रारंभी एक वर्ष कला शिक्षण व आरोग्य व शारीरिक शिक्षण व कार्य शिक्षक विषय शिकविण्यासाठी अंशकालीन निदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना नंतर कामावरुन कमी करण्यात आले आहे. आता अंशकालीन निदेशक कोर्टात गेले आहेत.आज स्थितीत शिक्षणाचा हक्क असताना कला गुणांना वाव देणारे, शारीरिक सुदृढता निर्माण करण्यासाठी शाळेत एकही शिक्षक असू नये ही शिक्षण क्षेत्राची शोकांतिका आहे.(तालुका प्रतिनिधी)