शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गरजूंना धान्य वितरण आणि बेघरांची वसतिगृहात सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद ...

ठळक मुद्देसंडे अँकर । ठिकठिकाणी अडकलेल्या जिल्ह्यातील गरीब व मजुरांची माहिती नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमाही बंद आहे. या काळात गोर गरीबांचे हाल होवू नये. कुणीही अन्नधान्या वाचून अडचणीत येवू नये, यासाठी प्रशासनाने गोरगरीबांना जीवनाश्यक वस्तूचा पुरवठा सुरू केला आहे. तर जिल्ह्याच्या विविध भागात असलेल्या बेघरांसाठी निवास व भोजनाची व्यवस्था वसतीगृहात करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली. जीवनावश्यक वस्तूचे दुकाने उघडी असली तरी हाताला काम नसल्याने गोरगरीबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार गोरगरीबापर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याची व्यवस्था करीत आहेत. भंडारा शहरात उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध ठिकाणी धान्याचे पॅकेट वाटप केले जात आहे. तसेच जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने लाखांदूर तालुक्यातील गरजू व मजुरांसाठी एक क्विंटल तांदूळ देण्यात आले आहे.शहरात असलेल्या बेघर व भिकाऱ्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था शासकीय वसतीगृहात करण्यात आली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंग प्रमाणे राहण्याची सोय असणार आहे. शहरातील विविध भागात असलेल्या अशा बेघर भिकाऱ्यांचे सर्व्हेक्षण प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांना त्याठिकाणी हलविले जात आहे.शिवभोजन केंद्र सुरूकोरोना संसर्गाच्या प्रादूर्भावाच्या शक्यतेने येथील जिल्हा परिषद उपहारगृहात असलेले शिवभोजन केंद्र बंद करण्यात आले होेते. मात्र शनिवारपासून सदर केंद्र सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार शनिवारी केंद्र सुरू झाले. याठिकाणी सुद्धा सोशल डिस्टंन्सिंग पाळण्यात येणार आहे. या केंद्राची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदीप काठोळे यांच्याकडे देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात भोजन मिळावे, हा या मागचा उद्देश आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना केल्या असून त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.विविध समन्वय समित्याकोरोना उपाय योजनेसाठी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी विविध समित्या गठित केल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू पुरवठा व व्यवस्थापन सनियंत्रण समिती, जनजागृती समिती, संपर्क शोधक समिती, तालुकास्तरीय सनियंत्रण समिती, वैद्यकीय व आरोग्य विषयक वस्तू व सेवापुरवठा समन्वय समिती, आंतरजिल्हा व आंतरराज्यीय समन्वय समिती, नागरिक भागातील व्यवस्थापन विषयक समिती गठित करण्यात आली आहे. जबाबदार अधिकाºयाची या समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना या साथ रोगाचा एकजुटीने मुकाबला करू या. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनास सहकार्य करावे व आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक