शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
5
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
6
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
7
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
8
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
9
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
10
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
11
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
12
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
13
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
14
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
15
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
16
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
17
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
18
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
19
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
20
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधक निर्देशाच्या उल्लंघनप्रकरणी दहा हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:36 IST

: लाखांदूर येथील घटना लाखांदूर : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सर्वत्र मंगल कार्यालये, सभागृहात गर्दी टाळण्याचे बंधनकारक केलेले असताना ५० ...

: लाखांदूर येथील घटना

लाखांदूर : कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सर्वत्र मंगल कार्यालये, सभागृहात गर्दी टाळण्याचे बंधनकारक केलेले असताना ५० पेक्षा अधिक वऱ्हाडींना घेऊन लग्न समारंभ आयोजित केल्याने १० हजार रुपये दंडाची कारवाई केल्याची घटना घडली. सदर कारवाई लाखांदूर येथील तहसील, पोलीस व नगरपंचायत प्रशासन आदींच्या संयुक्त पुढाकारात १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान स्थानिक लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालय चालकाविरोधात करण्यात आली.

माहितीनुसार, घटनेच्या दिवशी स्थानिक लाखांदूर येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शासनाने यापूर्वीच राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांचा संभाव्य धोका लक्षात घेता सर्वत्र मंगल कार्यालय व सभागृह चालकांना ५० पेक्षा अधिक नागरिकांची गर्दी होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले होते. तथापि, या निर्देशांचे पालन न झाल्यास प्रारंभी दंडात्मक व दुसऱ्यांदा, तसेच आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश निर्गमित केले आहेत. त्यानुसार घटनेच्या दिवशी येथील मंगल कार्यालयात ५० पेक्षा अधिक नागरिक लग्न समारंभात आढळून आल्याने संभाव्य धोका लक्षात घेता येथील तहसील, पोलीस व नगरपंचायत प्रशासन आदींच्या संयुक्त पुढाकारात १० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यावेळी सदर मंगल कार्यालय चालकाने येथील नगर पंचायत प्रशासनाकडे दंडाच्या रकमेचा भरणादेखील केला आहे. दरम्यान, तालुक्यात कोरोना पार्श्वभूमीवर येथील तालुका प्रशासनाने केलेल्या या दंडाच्या कारवाईने कोरोना निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स :

नगर पंचायत प्रशासनाचा गलथान कारभार

विवाह सोहळ्यात ५० पेक्षा अधिक नागरिक आढळून आल्याने येथील तालुका प्रशासनाने मंगल कार्यालय चालकाविरोधात १० हजार रुपये दंडाची कारवाई केली. सदर कारवाईनुसार संबंधित चालकाने दंडाचा भरणादेखील केला. मात्र, नगर पंचायत प्रशासनांतर्गत दंडाचा भरणा केल्याच्या पावतीवर १६ मार्चऐवजी १७ मार्च, अशी तारखेची नोंद करण्यात आल्याने येथील नगर पंचायत प्रशासनाच्या गलथान कारभाराची एकच चर्चा होती.