शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण दिशेकडे पाय करून का झोपू नये? दक्षिण दिशा अशुभ का मानतात? जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 22:18 IST

धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशेस पाय पसरून झोपणे निषिद्ध मानले जाते. या गोष्टीला विज्ञानाचीदेखील पुष्टी आहे.

ठळक मुद्देदक्षिणेकडे पाय केल्यास देहातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होत राहते. अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय ज्ञानतंतूची उलट गतीने क्रिया चालू झाल्यामुळे मस्तकास शीण येतो. सतत वाईट स्वप्ने पडू लागतात. वरचेवर जाग येते. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये.

बालवयात मुलांना अनेक प्रश्न पडतात. समजूतदार पालक वेळोवेळी मुलांचे शंकानिरसन करतात. बाकीचे पालक 'गप रे' म्हणत, मुलांची चिकित्सक वृत्ती दाबून टाकतात. तीच सवय जडून मोठेपणी, अनेक गोष्टी फक्त ऐकीव माहितीनुसार केल्या जातात. मात्र, त्यामागचे शास्त्र काय, असे कोणी विचारले, तर आपल्याकडे उत्तर नसते. कारण, ते जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्नच केलेला नसतो. म्हणून अशाच काही पारंपरिक समजुतींचा खुलासा करण्याचा प्रयत्न. 

झोप हा आपल्या दिनचर्येचा सर्वात महत्त्वाचा भाग. त्यावर आपला सबंध दिवस अवलंबून असतो. मात्र, झोपच अपुरी झाली, तर पुढच्या दिवसावर त्याचा विपरित परिणाम होतो. तो टाळण्याचा पूर्वजांनी सांगितलेला एक उपाय म्हणजे, दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये. 

हेही वाचा: पिंपळावर मुंज्या असतो?...छेः हो, रात्रीच्या वेळी पारावर न जाण्यामागचं खरं कारण वेगळंच; जाणून घ्या!

वेदवाणी प्रकाशनाच्या धर्मशास्त्रावर आधारित एका पुस्तकात, या समजुतीचा सविस्तर खुलासा केला आहे. धर्मशास्त्रानुसार दक्षिण दिशेस पाय पसरून झोपणे निषिद्ध मानले जाते. या गोष्टीला विज्ञानाचीदेखील पुष्टी आहे. विश्वातील प्रत्येक अणुरेणुमध्ये चुंबकीय आकर्षण असून प्रत्येक कण कोणत्या तरी विशाल कणाकडे ओढला जातो, हे दिसून येते. याचा परिणाम म्हणून प्रत्येक सुक्ष्म कणास एक प्रकारची भ्रमण गती असते. आपली पृथ्वीदेखील सूर्याकडे चुंबकशक्तीने आकृष्ट होते. खुद्द सूर्यदेखील त्याहून मोठ्या सूर्याकडे चुंबकीय शक्तीने खेचला जातो. 

विश्वातील 'ध्रुव' नामक ताऱ्याकडे हे विश्व सतत आकर्षले जाते. ध्रुव तारा ज्याबाजूला असेल, त्या दिशेने देहातील अणुरेणू कणांचे आकर्षण होत असते. अगदी पोटातील अन्नपदार्थदेखील त्या दिशेने सुक्ष्मत: खेचले जातात. त्यामुळे उत्तरेकडे पाय करून नैसर्गिकरित्या चुंबकीय आकर्षणाचा लाभ देहाला आपोआप मिळतो. पण त्याउलट दक्षिणेकडे पाय केल्यास देहातील सर्व सूक्ष्म तंतूंचे आकर्षण उलट दिशेने होत राहते आणि अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. शिवाय ज्ञानतंतूची उलट गतीने क्रिया चालू झाल्यामुळे मस्तकास शीण येतो. परिणामी निद्रावस्था पुरेसे समाधान देत नाही. सतत वाईट स्वप्ने पडू लागतात. वरचेवर जाग येते. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, असे शास्त्र सांगते. पूर्व-पश्चिम, उत्तर या तिन्ही दिशांकडे अनर्थ ओढवत नाही. 

दक्षिण दिशा अशुभ का मानतात?

'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असताना दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ झालेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एक प्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशाही त्याज्य समजली जाऊ लागली. ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते, की यज्ञप्रक्रीयेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला, तरी तो टाळून 'अवाची' असे म्हटले जाते. 

खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि त्याची दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते, तर केवढी भयानक आपत्ती आली असती. ज्यांचे या जन्मापुरते इहलोकीचे कार्य संपले आहे, अशा जीवांना आपल्याकडे खेचून घेऊन त्यांना आपल्यात समाविष्ट करणारा, त्यांच्या दोषांचे शुद्धीकरण करणारा यम तिरस्करणीय कसा?

यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण. जगातील प्रत्येक बारीकसारीक क्रियेत नियमनाची आवश्यकता असते. म्हणून यज्ञकर्मात विशेषत: शांतीकर्मात यमाचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्याची पूजा होते. उत्क्रांतीची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे असते. शेवटी लय पुन्हा दक्षिणेतच होतो. पृथ्वीच्या उदरातील महाचुंबक दक्षिणोत्तर असाच आहे. म्हणून रात्री झोपताना दक्षिणेकडे शीर आणि उत्तरेकडे पाय करून झोपायचे असते.

हेही वाचा : 'मांजर आडवी गेली की काम होत नाही', हा भन्नाट 'शोध' कुणी, कसा आणि का लावला माहित्येय?