शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:30 IST

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले ...

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले तरी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले नाही; तर दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची धाकधूक सुरू आहे. काही पालकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला; तर काही पालकांनी १० महिन्यांपासून घरात एकलकोंडे बनलेल्या मुलांना आकाश मोकळे व्हावे म्हणून शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बहुतांश पालक अजूनही संभ्रमात आहेत. मुलांचे लसीकरण करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला हवा होता, असा सूरही पालकांमधून उमटला. मागील वर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; परंतु कुठे मोबाईलच नसणे, तर कुठे तांत्रिक अडथळे आले. आता शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याआधी शासनाने काेविड-१९ बाबत दक्षतेसाठी शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीचे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये काटेकोर, तर अनेक शाळांमध्ये पालनच होत नसल्याची स्थिती आहे. हे पाहून पालकांमध्ये धाकधूक आहे. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आता मात्र मुलांना शाळेत पाठविले पाहिजे, असे काही पालकांचे मत आहे.

नववी ते बारावी उपस्थितीचा आलेख वाढेना

नववी ते १२वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवस उपस्थिती कमी होती. मात्र त्यानंतर हे प्रमाण वाढले. एकूण उपस्थितीनुसार हे प्रमाण शहरी भागात ५५, तर ग्रामीण भागात ४५ टक्के राहिले. परंतु त्यापलीकडे उपस्थितीमध्ये वाढ होऊ शकली नाही. उलट काही ठिकाणी शिक्षक बाधित निघाले. ते बरे झाले असले तरी उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. पालकांमधून कोरोनाचे भय अद्याप दूर झाले नसल्याचे चर्चेतून जाणवले.

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी : ५३०२५

सहावी : ५१७४३

सातवी : ५१ २२८

आठवी : ४९५४०

जिल्ह्यातील शाळांची संख्या : १९९४

शिक्षकांची संख्या : ९०४३

पालकांना काय वाटते?

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड- १९ च्या नियमांचे काटेकोर पालन होणार आहे का? कोण जबाबदारी घेणार? शाळेपेक्षा लेकरांचा जीव महत्त्वाचा आहे. मुलांना पाठवणार नाही.

- रोहिदास घोडके, पालक, बीड.

----

आठ-नऊ महिने ऑनलाईन शिक्षण झाले. आता ऑफलाईन झाले तर बरे होईल. कोरोनाचे वातावरण कमी झाले आहे. शाळा सुरू होणे आवश्यक आहे. शाळांनी काळजी घेत निर्जंतुकीकरण व नियमांचे पालन झाल्यास अडचणी येणार नाहीत. मुलांना शाळेत पाठवणार.

- शिवाजी परळकर, पालक

------------

मुलांना आकाश मोकळे हवे

घरी मुले मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेली आहेत. एकलकोंडी बनत आहेत. त्यामुळे पालकही हैराण झाले आहेत. शाळेत मुले गेली तर अभ्यासाला लागतील. सामूहिक खेळ नसले तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मोकळे होतील. मुलाला शाळेत पाठवणार आहे.

- मुरलीधर राऊत, पालक

----

पालकांनी टाळू नये

पालकांनी संमतीपत्र देऊन मुलांना शाळेत पाठवावे. मुले आजारी असतील तर पाठवू नये. मास्क, सॅनिटायझर सोबत द्यावे. डबा, पाण्याच्या बाटलीची अदलाबदल करू नये, शाळेत घोळका करू नये, अशा दक्षतेच्या सूचना कराव्यात. परिस्थिती नियमित व पूर्वपदावर येत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्याचे पालकांनी टाळू नये. शाळांनीही शासन निर्देशांचे पालन करून काळजी घ्यावी.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)

..........................