शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार, मुलांना शाळेत पाठविण्यास पालकांची धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:30 AM

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले ...

बीड : येत्या २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होणार आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू असले तरी उपस्थितीचे प्रमाण वाढलेले नाही; तर दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम आहे. अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची धाकधूक सुरू आहे. काही पालकांनी स्पष्टपणे नकार दर्शविला; तर काही पालकांनी १० महिन्यांपासून घरात एकलकोंडे बनलेल्या मुलांना आकाश मोकळे व्हावे म्हणून शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बहुतांश पालक अजूनही संभ्रमात आहेत. मुलांचे लसीकरण करूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला हवा होता, असा सूरही पालकांमधून उमटला. मागील वर्षी मार्चपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला; परंतु कुठे मोबाईलच नसणे, तर कुठे तांत्रिक अडथळे आले. आता शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी शासन-प्रशासन प्रयत्न करीत आहेत. नववी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याआधी शासनाने काेविड-१९ बाबत दक्षतेसाठी शाळांमध्ये निर्जंतुकीकरण, थर्मल गन, ऑक्सिमीटरद्वारे तपासणीचे निर्देश दिले होते. मात्र काही शाळांमध्ये काटेकोर, तर अनेक शाळांमध्ये पालनच होत नसल्याची स्थिती आहे. हे पाहून पालकांमध्ये धाकधूक आहे. मात्र परिस्थिती पूर्वपदावर येत असताना आता मात्र मुलांना शाळेत पाठविले पाहिजे, असे काही पालकांचे मत आहे.

नववी ते बारावी उपस्थितीचा आलेख वाढेना

नववी ते १२वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही दिवस उपस्थिती कमी होती. मात्र त्यानंतर हे प्रमाण वाढले. एकूण उपस्थितीनुसार हे प्रमाण शहरी भागात ५५, तर ग्रामीण भागात ४५ टक्के राहिले. परंतु त्यापलीकडे उपस्थितीमध्ये वाढ होऊ शकली नाही. उलट काही ठिकाणी शिक्षक बाधित निघाले. ते बरे झाले असले तरी उपस्थितीवर परिणाम झालेला आहे. पालकांमधून कोरोनाचे भय अद्याप दूर झाले नसल्याचे चर्चेतून जाणवले.

जिल्ह्यातील विद्यार्थिसंख्या

पाचवी : ५३०२५

सहावी : ५१७४३

सातवी : ५१ २२८

आठवी : ४९५४०

जिल्ह्यातील शाळांची संख्या : १९९४

शिक्षकांची संख्या : ९०४३

पालकांना काय वाटते?

कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या शाळा सुरू करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तसेच कोविड- १९ च्या नियमांचे काटेकोर पालन होणार आहे का? कोण जबाबदारी घेणार? शाळेपेक्षा लेकरांचा जीव महत्त्वाचा आहे. मुलांना पाठवणार नाही.

- रोहिदास घोडके, पालक, बीड.

----

आठ-नऊ महिने ऑनलाईन शिक्षण झाले. आता ऑफलाईन झाले तर बरे होईल. कोरोनाचे वातावरण कमी झाले आहे. शाळा सुरू होणे आवश्यक आहे. शाळांनी काळजी घेत निर्जंतुकीकरण व नियमांचे पालन झाल्यास अडचणी येणार नाहीत. मुलांना शाळेत पाठवणार.

- शिवाजी परळकर, पालक

------------

मुलांना आकाश मोकळे हवे

घरी मुले मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेली आहेत. एकलकोंडी बनत आहेत. त्यामुळे पालकही हैराण झाले आहेत. शाळेत मुले गेली तर अभ्यासाला लागतील. सामूहिक खेळ नसले तरी शारीरिक व मानसिकदृष्ट्या मोकळे होतील. मुलाला शाळेत पाठवणार आहे.

- मुरलीधर राऊत, पालक

----

पालकांनी टाळू नये

पालकांनी संमतीपत्र देऊन मुलांना शाळेत पाठवावे. मुले आजारी असतील तर पाठवू नये. मास्क, सॅनिटायझर सोबत द्यावे. डबा, पाण्याच्या बाटलीची अदलाबदल करू नये, शाळेत घोळका करू नये, अशा दक्षतेच्या सूचना कराव्यात. परिस्थिती नियमित व पूर्वपदावर येत आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे पाल्यांना शाळेत पाठविण्याचे पालकांनी टाळू नये. शाळांनीही शासन निर्देशांचे पालन करून काळजी घ्यावी.

- श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (प्रा.)

..........................