शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले ...

दीड वर्षांपासून शाळा बंद : मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढला

दीड वर्षांपासून शाळा बंदचा परिणाम : टीव्ही, मोबाईलच्या आहारी गेली मुले

अविनाश मुडेगावकर

अंबाजोगाई : कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने मुले घरातच आहेत. मुलांमध्ये चिडचिडेपणा, एकाग्रता कमी होणे, हट्टीपणा वाढत चालल्याने पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता गेल्यावर्षी पहिले ते चौथीचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंदच राहिले. चौथी ते बारावीच्या शाळा काही दिवसांसाठी सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शाळा बंद ठेवण्यात आल्या. यावर्षीदेखील विद्यार्थ्यांसाठी शाळा बंदच आहेत. ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मुले घरातच असल्याने मोबाईल व टीव्हीचे मोठे व्यसन त्यांना जडत आहे. याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. मुलांमध्ये आत्मविश्वास नसणे, नैराश्य, चिडचिडेपणा वाढीस लागला आहे. एकलकोंडेपणा, हट्टीपणा, कशातच मन न लागणे. अशा विविध समस्या मुलांमध्ये जाणवत आहेत. परिणामी या सर्व स्थितीमुळे पालकांचेही मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे समोर येत आहे.

मुलांच्या समस्या

शाळा बंद असल्याने मुलांना मित्रांबरोबर प्रत्यक्ष जाऊन खेळता येत नाही. त्यामुळे खेळणे थांबले आहे. त्यामुळे मुले एकलकोंडी होत चालली आहेत. मुलांमधील ऊर्जेला सद्यस्थितीत पुरेशी वाट मिळत नाही. मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढत आहे. मुले जास्त हट्टी होत आहेत. मोबाईल, संगणक, टॅबच्या आहारी गेली आहेत.

पालकांच्या समस्या

शाळा बंद असल्याने पालकांना मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. यातूनच नैराश्य, चिडचिडेपणाही वाढत असल्याचे समोर येत आहे. मुले मोबाईलच्या आहारी जात असल्याचे पाहून, पालकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे.

मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

मुलांमधील चिडचिड वाढली आहे. मोबाईलच्या अति वापरामुळे डोळ्यांवर परिणाम होत आहेत. मुले एकलकोंडी होत आहेत. सकारात्मक चर्चा हवी, ती होत नाही. तसेच शिक्षक व विद्यार्थी संवाद गांभीर्याने होत नाहीत.

:डॉ. राजेश इंगोले,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई

मुलांमध्ये मन न लागणे आदी समस्या जाणवत आहेत. पालकांचेही मानसिक आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. आळशीपणा वाढत आहे. बुद्धिमत्तेची चंचलता कमी होणे, द्विधा स्थिती निर्माण होत आहे. कमजोरी, थकवा, डोकेदुखी अशी लक्षणे दिसून येतात.

-डॉ. शिवराज पेस्टे,

मानसोपचार तज्ज्ञ, अंबाजोगाई.

वर्गनिहाय विद्यार्थी

पहिली - ४४,८७७

दुसरी - ५०,७९०

तिसरी- ५३,२९७

चौथी-- ४८,८९५

पाचवी- ५२,८३३

सहावी- ५२,८९७

सातवी- ५२,०१४

आठवी- ५१,८०२

नववी- ४९,८९३

दहावी- ४८,९८३

----------

शाळेच्या निर्णयाकडे लक्ष

शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले जात आहे. ग्रामीण भागातील काही शाळा सुरूही झाल्या आहेत. मात्र, नगर परिषदेच्या हद्दीतील शाळा बंदच आहेत. त्या कधी सुरु होतील? याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.