शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:51 IST

Niti Aayog On EV Sale: जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत.

भारतात इलेक्ट्रीक वाहनांची विक्री म्हणावा तसा वेग घेत नाहीय. केंद्र आणि राज्य सरकारने सबसिडी कमी केली असून यामुळे आधीच महाग असलेल्या ईलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती आणखी वाढल्या आहेत. ओलाची जी एस१ प्रो काही वर्षांपूर्वी १.०८ लाखाला ऑनरोड मिळत होती ती आता १.८० लाखावर गेली आहे. असाच फटका मोठ्या वाहनांनाही बसला आहे. 

जसजसे तंत्रज्ञान जुने होत जाईल तसे ईव्हींच्या किंमती उतरतील असे सांगितले जात होते. परंतू, उलटेच झाले आहे. सबसिडी कमी झाली, कंपन्यांनी किंमती वाढविल्याने ईव्हींच्या किंमती वाढलेल्याच आहेत. तरीदेखील गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलैमध्ये ईव्ही कारची विक्री ९० टक्क्यांनी वाढलेली आहे. असे असले तरी जेवढी विक्री अभिप्रेत होती तेवढी झालेली नाही, ईव्हीच्या विक्रीचा वेग हवा तेवढा वाढलेला नाही, असे निती आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे.  

अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीनसारख्या देशांपेक्षा भारतात ईव्हीची विक्री मंदावलेलीच आहे. २०२४ मध्ये भारतात जेवढी वाहने विकली गेली, त्यात ईव्हीचा वाटा फक्त ७.६ टक्के आहे. २०३० पर्यंत हा वाटा ३० टक्के करण्याचे लक्ष्य आहे, परंतू पुढील पाच वर्षांत हे लक्ष गाठण्यासाठी तो पुरेसा नाहीय असे निती आयोगाचे म्हणणे आहे. 

भारताने २०१६ मधील ५०,००० युनिट्सवरून २०२४ मध्ये २८ लाख युनिट्सपर्यंत ईव्ही विक्री वाढवली आहे. याच काळात जागतिक बाजारातील ईव्ही विक्री ९.१८ लाखांवरून १.८७ कोटी युनिट्सपर्यंत गेलेली आहे. ३० टक्क्यांचे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील ५ वर्षांत ईव्हीचा वाटा २२ टक्क्यांहून अधिक वाढवावा लागणार आहे. 

दुचाकी आणि तीन चाकी ईलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीचा वेग आहे, परंतू कार आणि बस सारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची विक्री खुपच मंदावलेली आहे. ट्रकसारख्या लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी ईव्ही घेण्यास सुरुवातही झालेली नाही. कमी किंमतीत कार आहेत, परंतू त्या शहरातच चालविण्याच्या रेंजच्या आहेत. तसेच ज्या जास्त रेंजच्या कार आहेत त्यांची किंमत ही १३-१४ लाखांपासून ते पार ३०-४० लाखांपर्यंत आहे. यामुळे याच श्रेणीतील पेट्रोल, डिझेलच्या कार या यापेक्षा खूप कमी खर्चात मिळतात. यामुळे लोक अजूनही याच कारकडे वळत आहेत. दुसरे कारण म्हणजे चार्जिंगची समस्या आहे. अद्याप म्हणावे तसे चार्जिंग सुविधा विकसित झालेली नाही. यामुळे बाहेरगावी जायचे असेल तर दुसरी कार आणि तिथल्यातिथे शहरात फिरायचे असेल तर ईलेक्ट्रीक कार अशा दोन दोन कार पोसण्याएवढा भारतीय श्रीमंत झालेला नाहीय. याचाही फटका ईव्हीच्या विक्रीला बसत आहे.
 

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर