शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं-जनविकास फुटीच्या मार्गावर!

By admin | Updated: January 7, 2015 22:43 IST

महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

‘स्थायी’वर नजर : तीन सदस्य बहिर्गमनाच्या तयारीत; विधानसभा निवडणुकीनंतर वेगवान हालचाली
अमरावती : महापालिकेत नऊ सदस्य संख्या असलेल्या रिपाइं, जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडी गटात फूट पडण्याची चिन्हे आहेत. तीन सदस्य कमालीचे नाराज असून ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
२०१२ मध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आ. सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेस तर माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडीच्या नावे संघटना स्थापन करुन निवडणुकीत नशीब आजमाविले. या दोन्ही नेत्यांना महापालिका निवडणुकीत फारसे यश मिळाले नाही. जनविकास काँग्रेस सहा तर जनकल्याण आघाडीचा एकच सदस्य निवडून आला. मात्र, महापालिकेत विविध समित्यांवर अधिराज्य मिळवायचे असल्यास गटस्थापनेसाठी नऊ सदस्य संख्या आवश्यक आहे. त्यामुळे जनकल्याण, जनविकासच्या सदस्यांनी रिपाइं (आठवले गट) चे दोन सदस्य सोबत घेऊन नऊ सदस्यांनी रिपाइं- जनविकास- जनकल्याण या नावाने महापालिकेत गट स्थापन केला. या गटाचे नेते प्रकाश बनसोड हे आहेत. गटाच्या सदस्य संख्येनुसार विषय समिती अथवा स्थायी समितीत सदस्यांची नियुक्ती करण्याचा शिरस्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनील देशमुख, जगदीश गुप्ता भाजपात प्रवेशकर्ते झाले. त्यामुळे महापालिकेत जनविकास काँग्रेस, जनकल्याण आघाडीचे सदस्य वाऱ्यावर आहेत. नेत्यांनी पक्ष बदलविल्यानंतर होणाऱ्या दुर्लक्षामुळे हे सदस्य कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेत त्यांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे सुध्दा ते हैराण आहेत. या गटातील नऊ सदस्यांपैकी काहीच सदस्यांना महत्वाच्या जागी नियुक्ती मिळविता आली. त्यामुळे इतर सदस्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. महापालिका निवडणुकीत आ. सुनील देशमुख, जगदीश गुप्ता स्वतंत्र बॅनरखाली होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत चित्र पालटले. जनविकास, जनकल्याण आघाडीच्या सदस्यांना भाजपामध्ये जायचे नसल्याने काही सदस्य बाहेर पडण्याच्या मार्गाला असल्याचे चित्र आहे. एकेकाळचे सुनील देशमुखांचे खंदे समर्थक रतन डेंडुले यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत सुनील देशमुखांविरुध्द प्रचारात रतन डेंडुले यांनी आघाडी देत रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश केला.