शहरं
Join us  
Trending Stories
1
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
2
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
3
"...तर डॉ. तावरे, डॉ. हळनोरच्या जिवाला धोका, त्यांना सुरक्षा" द्या; सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
4
थरार: भरझोपेत पत्नीचा खून, रक्ताने माखलेली कुऱ्हाड दाखवत निर्दयी पती गावभर फिरला; मग...
5
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
6
महात्मा गांधींना जगाने ओळखावं यासाठी काहीही केलं गेलं नाही; PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा
7
ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाच्या ताफ्यानं ३ बालकांना चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू; एक गंभीर
8
इंग्लंडमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची सुरक्षा वाढवली; PCB च्या मागणीनंतर निर्णय, जाणून घ्या कारण
9
Best retirement Plan: २५ व्या वर्षात सुरुवात, रिटायरमेंटवर मिळतील ₹३ कोटी; पेन्शनही मिळणार, जाणून घ्या
10
बंगाल, दिल्ली, ओडिशा अन् तेलंगणा, भाजपाला किती जागा मिळणार?; अमित शाहांनी आकडा सांगितला
11
“पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचे अपयश अधोरेखित”; सुप्रिया सुळेंची टीका
12
लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 
13
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
14
T20 World Cup मध्ये रोहित ओपनर नको; भारतीय दिग्गजाचं मत, चाहत्यांनी दाखवला आरसा
15
बापरे! "जगभरात येणार कोरोनापेक्षाही भयंकर महामारी"; तज्ञांनी व्यक्त केली चिंता
16
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
17
पाकिस्तानच्या जीडीपीच्या दुप्पट एलआयसीची संपत्ती! तीन देश मिळूनही बरोबरी करू शकत नाहीत
18
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
19
"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग
20
चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

मेळघाटमध्ये पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा

By admin | Published: May 09, 2014 12:57 AM

जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची ओरड सुरु झाली असून मेळघाटमधील ८ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

अमरावती : जिल्हय़ातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची ओरड सुरु झाली असून मेळघाटमधील ८ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुरुवातीच्या काळात केवळ एका गावालाच टँकरने पाणीपुरवठा केला जात होता; मात्र आता टँकरच्या संख्येत वाढ झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील हत्तीघाट, खडीमल, तारुबांधा, ढोमणीफाटा, मोथाखेडा, पस्तलई, पाच डोंगरी व लवादा या आठ गावांना पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे ही गावे अतिदुर्गम भागातील असून तेथे पाण्याचे कुठलेही नैसर्गिक स्त्रोत नाहीत. त्यामुळे गावकर्‍यांना गावाबाहेरील विहिरी तसेच वाड्यांमधून पाणी आणावे लागत आहे. ऐन उन्हाळय़ात मेळघाटवासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाणीटंचाई फारशी जाणवत नव्हती. मात्र मे महिना उजाडताच पाणीटंचाईने आपले भीषण स्वरुप धारण केले आहे. येत्या काही दिवसांत याच भागातील काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. मेळघाट व्यतिरिक्त वरुड तालुक्यातील काही गावांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. मेळघाट वगळता अन्य तालुक्यांमध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला असून अशा गावांचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी त्या-त्या गावांमध्ये जाऊन नागरिकांशी चर्चा केली जात आहे. मेळघाटातील ज्या आठ गावांना टँकरनी पाणीपुरवठा होत आहे त्याठिकाणी नैसर्गिक स्त्रोत नसले तरी पाणीटंचाई कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना दृष्टिक्षेपात आहे. यंदाचा पाणीपुरवठा आराखडा जवळपास ४.५ कोटी रुपयांचा असून सध्या आराखड्यातील तिसर्‍या टप्प्यातील कामे सुरु झाली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र काही गावांमध्ये नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नसल्यामुळे अशा गावांची पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर जिल्हा परिषदेच्यावतीने पाठपुरावा सुरू आहे. (प्रतिनिधी) मेळघाटमध्ये ज्या गावात टँकरने पाणीपुरवठा होत आहे त्या गावांमध्ये मुळातच नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही. त्यामुळे तेथे स्त्रोत वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, हे जरी खरे असले तरी त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. -श्‍वेता बॅनर्जीकार्यकारी अभियंता