शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

बेसावध क्षणी सोडले पूर्णा प्रकल्पाचे पाणी

By admin | Updated: July 29, 2014 23:32 IST

चांदूरबाजार तालुक्यात ब्राह्मणवाडा (थडी) येथील महाप्रलयासाठी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी दोषी आहेत. गावकरी बेसावध असताना त्यांनी तीन मिटर पर्यंत धरणाचे दरवाजे उघड्याने गावात प्रचंड वित्तहाणी झाली.

सचिन सुंदरकर - ब्राह्मणवाडा थडीचांदूरबाजार तालुक्यात ब्राह्मणवाडा (थडी) येथील महाप्रलयासाठी पूर्णा प्रकल्पाचे अधिकारी दोषी आहेत. गावकरी बेसावध असताना त्यांनी तीन मिटर पर्यंत धरणाचे दरवाजे उघड्याने गावात प्रचंड वित्तहाणी झाली. याप्रकरणी संबंधितांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ब्राह्मणवाडा थडीचे सरपंच नंदू वासनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.धरणाचे दरवाजे तीन मिटरने उघड्याची पूर्वसूचना ब्राह्मणवाडा (थडी) च्या ग्रामस्थांना नव्हती. सकाळी ८ वाजेपर्यंत नदीला फारसे पाणी नव्हते. पूर्णा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी अर्धा इंच पाणी सोडतो, असे सांगितले. परंतु अचानक सकाळी ११ वाजता नऊही दरवाजे १० फुटापर्यंत उघडण्यात आल्याने बेसावध शेकडो नागरिकांच्या घरांत पाणी शिरले व वित्तहानी झाली. याला प्रशासन दोषी असल्याचा आरोप सरपंच वासनकर यांनी केला. पुरग्रस्ताने लावला होता गळफासगावात आलेल्या प्रलयकारी पुराने नागरिकांचे संसार उघड्यावर आले. घरातील सर्वकाही वाहून गेल्याचा धक्का बसलेल्या गोविंद नागोराव कुरवाळे या अठरा वर्षीय युवकाने सोमवारी सायंकाळी गळफास लाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांच्या समयसूचकतेमुळे त्याचे प्राण वाचले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेगाळ काढण्याचे काम सुरुमहाप्रलयानंतर गावात जेसीबीने गाळ काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करण्यात आले आहे. पुरामुळे आरोग्य केंद्रानजिक असणारी संरक्षक भिंत तुटल्याने तेथील मलबा काढण्याचेही काम जोरात सुरु आहेत. मशिदीसमोरही गाळ साफ करण्यात येत आहे.प्रशासनाचा नागरिकांच्या जीवाशी खेळब्राह्मणवाडा थडी हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावात सर्व समाजबांधव गुण्यागोविंदाने राहतात. परंतु रविवारी केवळ प्रशासनाच्या लापरवाहीमुळे एका युवकाचा बळी गेला. शेकडो नागरिकांचे संसार उघड्यावर आले. याला प्रशासनाचे कामचूकार अधिकारी दोेषी आहेत. अशा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ग्रामपंचायततर्फे मागणी केली जाणार असल्याचे सरपंचांनी सांगितले.ब्राह्मणवाड्यासाठी रविवार ठरला काळा दिवस ब्राह्मणवाडा थडी येथील पुर्णा नदीने रौद्ररुप धारण केले होते. पुराचे पाणी गंगामाय मंदिरापासून तर ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत शिरले. नागरिक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत होते. कुणी झाडावर तर कुणी गच्चीवर होते. यातच एका निष्पाप युवकाचा बळी गेला. ही मनुष्यहानी न भरुन निघणारी आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तीन मिटर पर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहीती आधी ग्रामपंचायतच्या जबाबदार अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांना दिली असती तर नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली असती. परंतु ग्रामपंचायतला एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडणार असल्याची माहीती नव्हती. गावात पुराचा तांडव सुरु होता. नागरिक जीव वाचविण्यासाठी पळत होते. घरातील धान्य पुरात वाहून गेले. नागरिकांचे कपडेलत्ते वाहून गेले. काही क्षणातच भरलेले घर कोसळून प्रचंड नुकसान झाले. ब्राह्मणवाडा वासीयांसाठी रविवारचा दिवस काळा दिवस ठरला. गावात महाप्रलय आल्याची माहिती जिल्हाप्रशासनाला माहिती पडली होती. परंतु बचाव पथक येथे सर्वकाही झाल्यावर पोहचले. मदतीसाठी धावले ते गावकरीच. एरव्ही आपसात वैमनस्य असणारे नागरीक सुध्दा यावेळी एकत्र आले होते. त्यांच्या सोबतिला मुस्लिम बांधव सुध्दा होते. कुणी दोर झाडाला बांधून तर कुणी मिळेल ती वस्तू घेऊन पुरातील नागरिकांना बाहेर काढले.