शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांच्या कचाट्यात भाजीपाला

By admin | Updated: December 3, 2014 22:40 IST

भाजीपाल्याला हल्ली सोन्याचे भाव आले आहेत. उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला महागल्याचा तर्क लावला जात असला तरी तो तत्त्वत: खोटा आहे. या महागाईमागे व्यापाऱ्यांची ‘व्यापार नीती’ असल्याचे

वस्तीनिहाय बदलतात भाजीपाल्याचे दर, दर निर्धारणाचा निकषच नाही
अमरावती : भाजीपाल्याला हल्ली सोन्याचे भाव आले आहेत. उत्पादन कमी झाल्याने भाजीपाला महागल्याचा तर्क लावला जात असला तरी तो तत्त्वत: खोटा आहे. या महागाईमागे व्यापाऱ्यांची ‘व्यापार नीती’ असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाले.
डिझेल, पेट्रोलच्या किमती कमी होत असतानाही वाहतुकीचे पूर्वीचे दर कायम आहेत. त्यात आता दुष्काळाची भर पडली. जिल्ह्याच्या काही भागांतही भाजीपाल्याचे भरपूर उत्पादन होते. पण ते पुरणारे नाही. याचा एकंदरीत परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर झाला. शेतकऱ्यांजवळून भाजीपाला अल्पदरात खरेदी करुन नंतर दलालांच्या माध्यमातून जादा दराने सामान्यांपर्यंत पोहोचतो. यात ना ग्राहकांचा फायदा, ना शेतकऱ्यांचा. केवळ दलाल आणि विक्रेतेच यामध्ये गब्बर होत आहेत. दर निर्धारणाचे कोणतेही एकक भाजीपाल्याबाबत नसल्याने ‘एरियावाईज’ दर बदलताना दिसतात.
बाजार समितीत खरेदीची मर्यादा नसावी
बाजार समितीमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. येथे किरकोळ भाजी विक्रेत्यांना १० किलोपेक्षा जास्त भाजीपाला खरेदी करण्याची सक्ती केली जाते. येथे भाजीपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कर, वाहतूक खर्चाचा बोझा सहन करावा लागतो. त्यामुळे जादा दराने ग्राहकांना भाजीपाला विकण्याखेरीज त्याच्याजवळ गत्यंतर नसते. हा प्रकार रोखण्यासाठी बाजार समितीमध्ये थेट शेतकरी व ग्राहकांमध्येच व्यवहार व्हावेत, असे मत भाजीपाला उत्पादक सुनील शेरेवार यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात उत्पादन; तरीही महाग
वांगी, पानकोबी, फुलकोबी, चवळी या भाज्या ५० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. या भाज्यांचे जिल्ह्यात उत्पादन होते. शेतकऱ्यांकडून कमी दरात व्यापारी खरेदी करतात आणि आवक कमी असल्याचे सांगून ग्राहकांकडून तगडे दर घेतात.