शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

उशिरा निकालाबाबत विद्यार्थ्यांत संताप

By admin | Updated: March 10, 2017 00:28 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत.

अभाविपची कुलगुरुंसोबत भेट : दिरंगाईबद्दल प्रशासनाने घेतली नरमाईची भूमिकाअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात हिवाळी परीक्षेचे निकाल उशिरा लागत असल्याने विद्यार्थी संतापले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बुधवारी कुलगुरुंची भेट घेऊन ४५ दिवसांच्या आत निकाल का लागले नाही? याबाबत जाब विचारला. अखेर कुलगुरुंनी निकाल उशिरा लागण्याची कारणमिमांसा स्पष्ट करुन विद्यार्थ्यांची समजूत काढली.विद्यापीठाने यावर्षीपासून आॅनलाईन निकाल ही प्रणाली लागू केली आहे. अतिशय जलद गतीने निकाल जाहीर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नवतंत्रज्ञानाचा वापर करताना विद्यापीठ प्रशासनाच्या काही तांत्रिक चुका राहून गेल्या आहेत. त्यामुळे हिवाळी परीक्षेच्या अनेक विषयांचे निकाल जाहीर करण्यात आले नाहीत. निकाल वेळेवर लागणार असा दावा विद्यापीठ प्रशासनाने केला होता. मात्र हा दावा फोल ठरल्याने अभाविपने बुधवारी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांची भेट घेवून निकाल उशिरा लागण्यामागील कारणे जाणून घेतली. यावेळी अभाविपचे प्रदेश मंत्री विक्रमजीत कलाने, जिल्हा संयोजक अखिलेश भारतीय, सहसंयोजक अभिलाष खारोडे आदींनी कुलगुरुंवर प्रश्नांचा भडीमार केला. २९ मार्च २०१६ रोजी अभाविपने विद्यापीठाशी संंबंधित ५८ मागण्यांबाबत धडक मोर्चा काढल्याची माहिती कुलगुरुंच्या पुढ्यात ठेवली. कुलगुरुंनी नुकतेच पदभार स्वीकारल्याने परीक्षा विभागाच माहिती घेऊ द्या, असे सांगितले होते. मात्र वर्षभराच्या कालावधी नंतरही निकाल उशिरा लागत असेल तर विद्यापीठाचा एवढा मोठा पसारा कशाला हवा, असा सवाल विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना विचारला. ९० दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असून अभियांत्रिकी आणि अन्य काही शाखांचे निकाल लावण्यात आले नाही. वेळेवर निकाल लागत नसल्याने उन्हाळी २०१७ आणि बॅकलॉग पेपरचा अभ्यास करायला वेळ मिळणार नाही, अशी कैफियत विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या समोर मांडली. अभियांत्रिकी, विधीसह अन्य शाखांचे निकाल ७ दिवसांच्या आत लावण्यात आले नाही तर अभाविप तिवम आंदोलन छेडणार असा इशारा देण्यात आला आहे. अभियांत्रिकी उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक अजुनही जाहीर करण्यात आले नाही. या परीक्षा मेपर्यत संपल्या नाही तर निकाल हे जूनपर्यत लागतील. निकाल उशिरा लागत असल्याने स्पर्धा परीक्षा, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. यावेळी विक्की पांडे, ज्ञानेश्वर खुपसे, सौरभ लांडगे, श्रीरंग देशमुख, अभय सूर्यवंशी, शास्वत वार्इंदेशकर, मंदार नानोटी, शंतनू भारतीय, संदीप चव्हाण, मनोज साबळे, सारंग झंवर, प्रसन्न कोशेट्टीवार, आकाश येवले, वैभव शिलणकर, सारैभ आगासे आदी उपस्थित होते.