शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रवेश नाकारला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

६४२० विद्यार्थ्यांवर अन्याय, कृषी विद्यापीठाला टाळे लावण्याचा भाजयुमोने दिला इशारा अमरावती : कृषिक्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी धडपडणाऱ्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या ...

६४२० विद्यार्थ्यांवर अन्याय, कृषी विद्यापीठाला टाळे लावण्याचा भाजयुमोने दिला इशारा

अमरावती : कृषिक्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी धडपडणाऱ्या कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या सहा हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणात राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद आणि राज्य शासनाने खोडा घातला आहे. तीन वर्षीय अभ्यासक्रमात उत्तीर्ण राज्यभरातील ६४२० विद्यार्थ्यांना यावर्षी कृषी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.

राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संलग्न कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमाच्या सन २०१८-२१ च्या विद्यार्थ्यांना कृषी पदवी शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षासाठी थेट प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांनी दहावीनंतर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला होता. त्यांंना पदवी परीक्षेसाठी आता पुन्हा अकरावीला प्रवेश घेण्याची वेळ राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद आणि राज्य शासनाने आणली आहे. त्यापूर्वी सन २०१७-२० या शैक्षणिक सत्रात उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी कृषी पदवी शिक्षणाच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतला आहे. काही तंत्रनिकेतननी विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका दिल्याच नाही व त्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेतले.

कृषी तंत्रनिकेतनची पदविका उत्तीर्ण केल्यानंतर कृषि पदवीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळत असल्यामुळे दहावीनंतर विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, आता या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. राज्यात चारही कृषी विद्यापीठांतील १०७ कृषी तंत्रनिकेतनमधील ६४२० विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या विषयात कृषी विद्यापीठांना लावण्याचा इशारा भाजयुमोने दिला आहे.

०००००००००००००

प्रवेश माहिती पुस्तकात जरी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश नाकारल्याची माहिती असली तरी हे प्रवेश माहिती पुस्तक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले नाही. हा प्रकार विद्यार्थ्यांचे खिसे खाली करण्यासाठी आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

- सोपान कनेरकर, प्रदेश सचिव, भाजयुमो.

००००००००००००००००००००

कृषी तंत्रनिकेतनची ही शेवटची बॅच होती. यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाला असल्याने पदवी प्रवेशाबाबत अगोदरच निर्णय झाला आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही.

- विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.